जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

चाकण MIDCच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सकारात्मक चर्चा; खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा पाठपुरावा…

चाकण : चाकण MIDC व परिसरातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे उद्योजकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आणि औद्योगिक विकासाबाबतची अनिश्चितता दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाइन उपस्थितीत, उद्योगमंत्री उदयजी सामंत आणि इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या या बैठकीत चाकण MIDCमधील वाहतूक कोंडीसह विविध औद्योगिक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

चाकण MIDC हे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या अर्थकारणाला आणि औद्योगिक विकासाला गती देणारे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे या परिसराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी तसेच उद्योजकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

स्थानिक पातळीवरील प्रश्न जलदगतीने सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग आणि पुढाकार महत्त्वाचा असतो. मात्र, २०२० सालच्या एका शासन निर्णयामुळे लोकप्रतिनिधींच्या अशा प्रयत्नांवर तसेच प्रश्न सोडविण्यासाठी बैठका आयोजित करण्यावर मर्यादा आल्याचे सांगत, हा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी बैठकीत केली.

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरला गती

नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम सुमारे १० हेक्टर जमीन अधिग्रहणाच्या प्रश्नामुळे रखडले होते. याबाबत मागील आठवड्यात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची राजधानी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर गडकरी यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार जमीन अधिग्रहणाचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

चाकणमध्ये कार्गो टर्मिनल, समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरची मागणी

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी चाकण विमानतळासाठी पूर्वनियोजित जागेवर प्रधानमंत्री गतिशक्ती टर्मिनल उपक्रमांतर्गत कार्गो टर्मिनल उभारण्याचा विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर–रांजणगाव MIDC–चाकण MIDC–तळेगाव MIDC ते JNPT बंदर असा समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर (Dedicated Freight Corridor) विकसित करण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या मागणीसंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे अधिकृत विनंती करण्यात यावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.

तळेगाव–चाकण–शिक्रापूर वाहतुकीचा ताण कमी होणार

सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुंबई–चेन्नई रेल्वे मार्गाची अलाइनमेंट चाकण औद्योगिक वसाहतीसाठी फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने करण्यात यश आले आहे. तसेच उरण–कर्जत–राजगुरुनगर–शिरूर महामार्गाची घोषणा करण्यात आली आहे. या महामार्गाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या प्रक्रियेला गती दिल्यास तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे या कामाला गती देण्याची विनंती उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे करण्यात आल्याचे डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले.

“मी विरोधी पक्षाचा लोकप्रतिनिधी असलो तरी चाकण MIDC व परिसरातील समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आजच्या बैठकीत सरकारच्या वतीने उद्योजकांना आश्वस्त करण्यात आले असून, त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला,” असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

चाकण MIDCमधील वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा विकास आणि औद्योगिक वाहतूक व्यवस्था याबाबत झालेल्या या चर्चेमुळे उद्योजकांच्या अपेक्षा वाढल्या असून, आता संबंधित निर्णयांची आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री. धनंजय काळे 📞 9665221813 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??