जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

हडपसरकरांच्या पाण्याशी प्रशासनाचा खेळ किती दिवस?

पाणी हा हक्क, उपकार नाही! रखडलेल्या योजना तातडीने सुरू करा; अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा

पुणे, दि. ११ ऑगस्ट २०२६ : हडपसर परिसरातील गंभीर पाणीटंचाईच्या प्रश्नावर काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रशांत सुरसे आणि सौ. पल्लवी सुरसे यांनी पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकुमार जगताप तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. हडपसरकरांना नियमित, पुरेसा आणि समान पाणीपुरवठा मिळावा, यासाठी रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

हडपसर गावठाण, गाडीतळ, सातववाडी, गोंधळेनगर, १५ नंबर, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, विठ्ठल नगर, ससाणेनगर आणि काळे-बोराटे नगर परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करत आहेत. पुणे महानगरपालिकेत समावेश होऊन अनेक वर्षे उलटूनही नागरिकांना पुरेसा व नियमित पाणीपुरवठा मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

पूर्ण झालेल्या योजना असूनही पाणीपुरवठा रखडला

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत काळे-बोराटे नगर येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरातील ३५ लाख लिटर क्षमतेचा जलसाठा प्रकल्प तसेच हडपसर बस डेपो येथील ४५ लाख लिटर क्षमतेचा जलसाठा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, या योजनांमधून अद्याप प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

या प्रश्नावर दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी निवेदन आणि दि. १६ मार्च २०२६ रोजी स्मरणपत्र देण्यात आले होते. त्यानंतर दि. ३० मार्च २०२६ पासून पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप प्रभावी कार्यवाही न झाल्याचा आरोप सुरसे यांनी केला.

तुकाई टेकडीवरील बुस्टर पंप सुरू करण्याची मागणी

तुकाई टेकडी येथील पाणीपुरवठा योजना सध्या ग्रॅव्हिटी पद्धतीने सुरू असल्याने सातववाडी, गोंधळेनगर, महात्मा फुले वसाहत, गाडीतळ, उन्नतीनगर, काळे-बोराटे नगर यासह विविध भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे तुकाई टेकडी पाणीपुरवठा योजना विद्युत (बुस्टर) पंपाद्वारे तातडीने सुरू करून कमी दाबाची समस्या दूर करावी, अशी ठाम मागणी प्रशांत सुरसे व पल्लवी सुरसे यांनी केली.

तसेच हडपसर बस डेपो येथील पाणीपुरवठा योजनेतून १५ नंबर, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी आणि विठ्ठल नगर परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक तांत्रिक नियोजन करून ठोस कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

दूषित पाण्याच्या तक्रारींची चौकशी करा

हडपसर परिसरातील काही भागांत पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे दूषित पाणी मिसळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या तक्रारींची तातडीने तपासणी करून दोषी आढळणाऱ्या यंत्रणा किंवा संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

पाणीपुरवठा योजनेतील दिरंगाईबाबत संबंधित Jain Irrigation Systems Limited या ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करून चौकशी करावी. दोष आढळल्यास ब्लॅकलिस्टसह कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

प्रशासनाला थेट सवाल

पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी आणखी किती वेळ लागणार?

३० मार्च २०२६ रोजी दिलेले लेखी आश्वासन अद्याप का पाळले गेले नाही?

तुकाई टेकडीवरील बुस्टर पंप कधी सुरू होणार?

दूषित पाण्याच्या तक्रारींवर कारवाई का होत नाही?

योजनेतील दिरंगाईसाठी जबाबदार ठेकेदारांवर कारवाई कधी होणार?

“हडपसरकरांना आता आश्वासन नको, प्रत्यक्ष पाणी हवे आहे. पूर्ण झालेल्या योजना केवळ कागदावर ठेवून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणे सहन केले जाणार नाही,” असा इशारा प्रशांत सुरसे यांनी दिला.

ऑगस्टअखेरपर्यंत कार्यवाही करा; अन्यथा जनआंदोलन

पुणे महानगरपालिका प्रशासनाने हडपसरच्या पाणीप्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना करून परिसराची प्रत्यक्ष पाहणी करावी. निवेदनातील मागण्यांवर कालबद्ध कार्यवाही करून पाणीपुरवठा योजना कोणत्या तारखेपासून सुरू होणार, तुकाई टेकडीवरील बुस्टर पंपाबाबत काय निर्णय घेतला आणि १५ नंबर, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी व विठ्ठल नगर परिसरासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली, याबाबत लेखी उत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत ठोस कार्यवाही झाली नाही किंवा लेखी उत्तर देण्यात आले नाही, तर हडपसरमधील नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी पुणे महानगरपालिका प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा प्रशांत सुरसे व सौ. पल्लवी सुरसे यांनी दिला.

यावेळी प्रशांत सुरसे, सौ. पल्लवी सुरसे, नंदकुमार अजोतीकर, बापूसाहेब पोटे, गणेश जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Editor sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री. धनंजय काळे 📞 9665221813 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??