देश विदेश

बँक खाती कायमची बंद होणार; RBIच्या आदेशानंतर आता बँका करणार कडक कारवाई..

सुनिल थोरात (प्रतिनिधी)

मुंबई : जर तुमचे असे बँक खाते असेल ज्यामध्ये तुम्ही बऱ्याच काळापासून कोणतेही व्यवहार करत नसाल किंवा ते वापरण्यास विसरला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अती महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँकेने अशी बँक खाती बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

ज्या बँक खात्यांमध्ये दीर्घकाळ व्यवहार होत नाहीत ती बँक खाती गोठवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास आरबीआयने बँकांना सांगितले.

निष्क्रिय बँक खाती म्हणजे काय?

निष्क्रिय बँक खाती ही अशी खाती आहेत ज्यात बँकेच्या धोरणानुसार १२-२४ महिन्यांच्या कालावधीमध्ये कोणतेही व्यवहार होत नाहीत. या कालावधीत खात्यात कोणताही व्यवहार न झाल्यास ते खाते निष्क्रिय मानले जाते.

ज्या बँक खात्यांमध्ये बराच काळ व्यवहार होत नाही अशी बँक खाती बंद करावीत असे सांगितले आहे.

आरबीआयने बँकांना आवश्यक पावले उचलून निष्क्रिय किंवा ‘गोठवलेल्या’ खात्यांची संख्या “तात्काळ” कमी करण्यास आणि त्यांच्या संख्येबद्दलची माहिती देण्यास सांगितले आहे.

अशा खात्यांमध्ये पडून असलेल्या पैशांच्या वाढत्या रकमेबद्दल चिंता व्यक्त करताना, आरबीआयने सांगितले की त्यांच्या तपासणीमध्ये अनेक समस्या समोर आल्या आहेत. ज्यामुळे खाती निष्क्रिय किंवा ‘गोठवली’ जात आहेत.

RBI च्या पर्यवेक्षण विभागाने नुकतेच एक विश्लेषण केले ज्यामध्ये असे दिसून आले की बऱ्याच बँकांमधील निष्क्रिय खाती/ दावा न केलेल्या ठेवींची संख्या त्यांच्या एकूण ठेवींपेक्षाही जास्त आहे.

सर्व बँकांच्या प्रमुखांना जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, बँकांना निष्क्रिय/ठेवी खात्यांची संख्या कमी करण्यासाठी आणि अशी खाती सक्रिय करण्याची प्रक्रिया सुलभ आणि त्रासमुक्त करण्यासाठी त्वरित आवश्यक पावले उचलण्याची सूचना देण्यात आली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??