राजकीयसामाजिक

दिवाळीत निवडणुकीचे वातावरण तापणार; राज्य सरकारने जाहीर केले वेळापत्रक ; वाचा सविस्तर…

संपादक सुनिल थोरात

पुणे : राज्य सरकारने महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिल्यानंतर आज (ता.१२) प्रभाग रचना तयार करण्यासाठीचे वेळापत्रक तयार केले आहे. ११ जून पासून प्रारूप प्रभाग रचना तयार होणार आहे.

त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून ४ सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम शिगेला पोचण्याची शक्यता आहे.

गेल्या सव्वातीन वर्षापासून महापालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य सरकारने निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने पुण्यात चार सदस्यांचा प्रभाग होणार असल्याचे निश्चित केले व त्यानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश महापालिकेला दिले.

पण यासाठीचे वेळापत्रक जाहीर नसल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. याबाबत आज ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. सरकारने हे वेळापत्रक जाहीर केल्यामुळे याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.

प्रारूप प्रभाग रचनेसाठी प्रगणक गटांची मांडणी करण्याचे १६ जून पर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यानंतर जनगणनेची माहिती तपासणे, प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणे, गुगल मॅपवर नकाशे तयार करणे, नकाशावर निश्चित केलेल्या हद्दी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणे, प्रभाग समितीच्या मसुद्यावर निवडणूक समितीच्या सदस्यांनी स्वाक्षरी करून प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाणार आहे.

या प्रक्रियेसाठी एका महिन्याची मुदत आहे. निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिल्यानंतर हा आराखडा जाहीर करून त्यावर हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत. त्यासाठी १० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

पुढील ११ दिवसात सुनावणी घेऊन प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे हा आराखडा पाठविला जाईल. त्यानंतर योग्य ते बदलास निवडणूक आयोगाकडून मान्यता दिल्यानंतर २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर केली जाईल.

उमेदवारांना दिवाळीचा ‘फराळ’ वाटावा लागणारच…

सप्टेंबर महिन्यात प्रभाग रचना अंतिम होणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार ठरवीत दिवशी त्यातील अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, महिला या आरक्षणाच्या सोडती काढल्या जातील. त्यानंतर कोणता प्रभाग खुल्या गटासह, ओबीसी, एसटी, एसीच्या पुरुषांसाठी आहे, महिलांसाठी आहे हे निश्चित होईल. ही प्रक्रिया होण्यासाठी ऑक्टोबर महिना उजाडेल.

त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल. ती किमान ४५ दिवसांची असते. ऑक्टोबरच्या अखेरीस दिवाळी असणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी दिवाळीपूर्वी मतदान होणार की नंतर हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. पण मतदान कधीही झाले तरी उमेदवारांना प्रभागात दिवाळीचा ‘फराळ’ वाटप करावा लागणार आहेच.

                     असे आहे वेळापत्रक

प्रगणक गटांची मांडणी करणे ११ ते १६ जून

जनगणनेची माहिती तपासणे – १७ ते १८ जून

स्थळ पाहणी – १९ ते २३ जून

गुगल मॅपवर नकाशे तयार करणे २४ ते ३० जून

नकाशावर निश्चित केलेल्या हद्दी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणे – १ ते ३ जुलै

प्रभाग समितीच्या मसुद्यावर सदस्यांनी स्वाक्षऱ्या करणे -४ ते ७ जुलै

प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे – ८ ते १० जुलै

प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व हरकती सूचना मागविणे – २२ जुलै ३१ जुलै

हरकती सूचनांवर सुनावणी घेणे १ ते ११ ऑगस्ट

प्रभाग रचनेतील बदलांसह अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी आयोगाकडे पाठविणे १२ ते १८ ऑगस्ट

निवडणूक आयोगाने मान्य केलेली प्रभाग रचना जाहीर करणे – २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री. धनंजय काळे 📞 9665221813 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??