जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

शिंदवणे येथे राजे उमाजी नाईक, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे भव्य आयोजन…

उरुळी कांचन (ता. हवेली) : अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट आणि आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, शिंदवणे यांच्या संयुक्त विद्यमाने राजे उमाजी नाईक, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचा भव्य सोहळा हवेली तालुक्यातील शिंदवणे येथे मोठ्या उत्साहात व थाटात पार पडला.

या जयंती उत्सवाचे हे दुसरे वर्ष असून, सकाळी भव्य मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व समाज घटकांनी महिलाव नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

मान्यवरांचा सहभाग आणि सन्मान…

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश महाडिक (माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष, शिंदवणे) यांनी विराजमान होऊन कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. समाजसेवेत मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांना ‘सेवारत्न पुरस्कार’ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान राणी भंडलकर, महिला जिल्हा अध्यक्ष अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे जिल्हा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मारुती (आबा) तुपे यांना समाजरत्न गौरव पुरस्कार, शंकरराव मनोहर पाटील (पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन) यांना जनसेवा रत्न पुरस्कार, देण्यात येणार आहे.

तसेच संजय भालेराव (माजी चेअरमन, लोणी काळभोर वि.का. सो.), यांना विशेष सन्मान करण्यात आला. प्रविण हेलगे (हडपसर विधानसभा प्रमुख), सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब बडेकर, बाळासाहेब झरांडे आणि दीपक मोरे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी समाजातील एकता, शिक्षण, महिलांचे सबलीकरण आणि इतिहास जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

संजय भालेराव यांनी आपल्या प्रभावी मनोगतात म्हटले की,

“ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नसतो, त्या समाजाचे भविष्य अंधकारमय होते.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि राजे उमाजी नाईक यांच्या विचारांचे अनुसरण करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने क्रांती करणे होय. शिवरायांनी ‘कलम’ हा शब्द न्यायासाठी वापरला आणि बाबासाहेबांनी तोच न्याय संविधानाद्वारे प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवला.” तसेच, त्यांनी राणी भंडलकर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना महिलांना समाजातील नेतृत्वात स्थान मिळावे, ही अपेक्षा व्यक्त केली.

प्रमुख आयोजक राणी भंडलकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,

“आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भंडलकर यांच्या मार्गदर्शनातून आम्ही समाज upliftment साठी प्रयत्नशील आहोत. अठरा पगड बारा बलुतेदार या संस्थेचा उद्देशच आहे. सर्व समाज, सर्व जाती-धर्म एकत्र येऊन सामाजिक ऐक्य आणि समतेचा संदेश देणे.” तसेच राणी भंडलकर यांनी गणेश महाडिक माजी सरपंच / विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष यांचे विशेष आभार मानले आणि पूरग्रस्तांसाठी त्यांनी दिलेल्या मदतीचा उल्लेख करत सर्वांना एकोप्याने कार्य करण्याचे आवाहन केले.

 

अध्यक्षस्थानी असलेल्या माजी सरपंच गणेश महाडिक यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हटले, “शिंदवणे ग्रामस्थांच्या एकतेने आणि राणी भंडलकर यांच्या पुढाकाराने हा उत्सव खऱ्या अर्थाने समाजजागृतीचा सोहळा ठरला आहे.
इतिहास बदलणारी माणसं आपल्यातून निर्माण झाली पाहिजेत. विचारांची श्रीमंती हीच खरी ताकद आहे.”

आयोजक व कार्यकर्त्यांचे योगदान…

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भंडलकर यांचे मार्गदर्शन लाभले. सदस्य दत्ताशेठ सूर्यवंशी, राहुलकाका भोडे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष समीरभाई मुलाणी, प्रसिद्धी प्रमुख शामराव जगताप, पुरंदर तालुका सचिव दिलीप गुरव,
जेजुरी शहर महिला अध्यक्ष मयुरी झरांडे, उपाध्यक्षा दीपाली कुंभार, सचिव योगिता मोरे, सरचिटणीस शलाका मोरे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब झरांडेदीपक मोरे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन प्राध्यापक भाऊसाहेब शिंदे यांनी केले.

कार्यक्रमाचा समारोप…

सत्कारमूर्तींच्या भोजन समारंभानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. एकतेचा, समाजसेवेचा आणि विचारांचा संदेश देणारा हा उत्सव ‘जय भीम, जय शिवराय, जय राजे उमाजी नाईक, जय महाराष्ट्र!’ अशा घोषणांनी गाजला.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री. धनंजय काळे 📞 9665221813 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??