राजकीय

वाल्मिक कराड कोण? शरण आल्यानंतर राजकीय भूकंप, १० मुद्द्यांमध्ये नजर टाकूया? संशयाची सुई..

पुणे : मस्साजोगमध्ये अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाचं कार्यालय आहे. ६ डिसेंबरला शुक्रवारी या कार्यालयात राडा झाला. टाकळीला राहणाऱ्या सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी कार्यालयातील अधिकाऱ्यांना मारहाण केली.

यानंतर घुले आणि त्यांच्या साथीदारांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या प्रकरणात माजी सरपंच संतोष देशमुख यांनी पवनचक्की कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बाजू घेतली आणि मध्यस्थी केली. याच गोष्टीचा राग घुलेंच्या डोक्यात होता. त्यातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सर्वात आधी विधिमंडळात बीडमध्ये सुरू असलेल्या गुन्ह्यांमागे वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप केला होता. याशिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही बीडमधील खंडणी प्रकरण, गुंडशाही, विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेलं बुथ कॅप्चरिंगचा मुद्दा उचलून धरला आहे. त्याशिवाय सुरेश धस यांच्यासह अनेक आमदारांनी बीडमध्ये घडलेल्या घटनांवर चिंता व्यक्त केली होता. दरम्यान या सर्वांचा सूत्रधार हा वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे. अखेर आज वाल्मिक कराड आज ३१ डिसेंबरला पुणे सीआयडीसमोर शरण गेला आहे.

                  कोण आहे वाल्मिक कराड?

वाल्मिक कराड याच दहावीपर्यंत शिक्षण गावात पूर्ण झालं. यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो परळीला गेला.

यादरम्यान परळीतील शिवाजी महाराज चौकात पहिल्यांदा भगवान बाबा मंडळ स्थापन करून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली.

यानिमित्ताने त्याने परळीत जम बसवला.1990 चा काळ भाजपचा राज्यात माधव पॅटर्न राबवण्यासाठी महत्त्वाचा काळ होता.

या काळात गोपीनाथ मुंडेंच्या हाताखाली राजकारण करायला सुरुवात. गोपीनाथ मुंडे या काळात वंजारी समाजाचे नेते म्हणून उदयास येत होते. मुंडे विधानभवन आणि ग्राऊंड लेव्हलला गाजत होत.

अनेक तरुण त्यांच्याकडे आकर्षित होत होते. यामध्ये वंजारी समाजातून येणारा वाल्मिक कराड हादेखील होता. १९९० सुरुवातील गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते असताना परळीत परमान कॉलनीत भाड्याने राहत होते.

तेव्हा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराडांनी वाल्मिक कराडांना गोपीनाथ मुंडेकडे काम मिळवून दिलं.. मुंडेंचं घरकाम करण्यापासून पडेल. तीकामं वाल्मिक करीत होते.

कराडांनी मुंडेंचा विश्वास संपादन केल्याचं बोललं जातं. गोपीनाथ मुंडेंशी असलेल्या जवळीकतेमुळे कराडासाठी राजकीय दारं उघडली.

वाल्मिक कराड हा परळी नगरपरिषदेचा नगराध्यक्ष राहिला आहे. जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आहे.
धनंजय मुंडे यांचा तो निकटवर्तीय आहे. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत मतदारसंघातील सर्व कामे वाल्मिक कराडच पाहतो.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित पवनचक्की अधिकाऱ्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे प्रमुख आरोपी आहे, तो वाल्मिक कराडचा निकटवर्तीय आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री. धनंजय काळे 📞 9665221813 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??