महाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार : कुणी शपथ घेतली? कुणाचा पत्ता कट?

नागपूर : नागपूरमध्ये रविवारी (१५ डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी ३३ कॅबिनेट मंत्र्यांनी आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.

       महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनदेखील सुरू होणार आहे, त्यामुळे नागपूर येथे मंत्र्यांसाठी ४० बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्याचं समजतं. १९९१ नंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला.

               ‘या’ मंत्र्यांचा ‘पत्ता कट’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राउंडवर नवनिर्वाचित सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडला आहे. एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या अनेक मंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि रवींद्र चव्हाण नसणार आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात मंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेलं नाही.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार केला तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही.

कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणारे नेते

नागपूरमधील या शपथविधी कार्यक्रमात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राषट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षाच्या ३३ नेत्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??