जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

आदेश झुगारत ‘रिव्हरव्ह्यू सिटी’कडून बेकायदेशीर काम ; चित्तरंजन गायकवाड यांचा आरोप…

तुळशीराम घुसाळकर 

कदमवाकवस्ती (पुणे) : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने स्पष्टपणे कामबंदीचे आदेश दिले असतानाही रिव्हरव्ह्यू सिटी प्रशासनाने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग (क्र. ६५) सेवा रस्त्यालगत पाईपलाईनचे काम सुरू ठेवले आहे. प्राधिकरणाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत रिव्हरव्ह्यू सिटीने प्रशासनालाच थेट आव्हान दिल्याचे चित्र समोर आले आहे.

कदमवाकवस्ती येथील सेवा रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र नियमबाह्य काम व रस्ता पूर्ववत न केल्यामुळे याआधी दोन तरुण जखमी झाले. त्यानंतर प्राधिकरणाने काम थांबवण्याचे आदेश देत तात्पुरती परवानगी रद्द केली आणि दंडही ठोठावला.

तरीदेखील रिव्हरव्ह्यू सिटीने आज पुन्हा खोदकाम सुरू केले असून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी वारजे येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात जाब विचारल्यावरच प्रशासन जागे झाले आणि कामबंदीचे आदेश काढले. पण हे आदेश पायदळी तुडवत रिव्हरव्ह्यू सिटीने मनमानी सुरूच ठेवली आहे.

गायकवाड यांनी स्पष्ट केले की,

“काम बंद करण्याचे आदेश असूनही रिव्हरव्ह्यू सिटी खोदकाम करत आहे. कायदा धाब्यावर बसवून नागरिकांच्या जिवाशी खेळ केला जात आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याला रिव्हरव्ह्यू सिटी प्रशासन जबाबदार असेल.”

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कामास परवानगी दिली. परंतु काही महिन्यापासून महाराष्ट्र राज्य इन्फास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीला ते टेंडर दिले असल्याचे सांगितले जात आहे. परंतु याबाबत पुढे येऊन ना जबाबदारी घेत ना प्रतिक्रिया देत अशात आता शासन व प्राधिकरणाने आदेश झुगारत काम करणाऱ्या रिव्हरव्ह्यू सिटी प्रशासनावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??