क्राईम न्युज

जमिनीच्या वादातून भवरापूर येथे तरुण शेतकऱ्याचा खून ; दोन आरोपी ताब्यात…

उरुळी कांचन (ता. हवेली) : जुन्या जमिनीच्या वादातून आणि सामाईक नदीवरील मोटार दुरुस्तीच्या कारणावरून भवरापूर येथे ३२ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा कारने धडक देत खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २ मार्च २०२६) दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

मृत तरुणाचे नाव महेश लक्ष्मण साठे (वय ३२, रा. भवरापूर, ता. हवेली, जि. पुणे) असे आहे. याबाबत लक्ष्मण सोपान साठे (वय ५८, व्यवसाय-शेती, रा. भवरापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीन गट क्र. १०४ संदर्भातील जुन्या वादातून तसेच सामाईक नदीवरील मोटार दुरुस्तीच्या कारणावरून अभिषेक साठे याच्यासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी अक्षय दशरथ साठे (वय ३२, रा. भवरापूर) व त्याचा साथीदार गोकुळ नाना कोकरे (वय २३, रा. आष्टापूर, ता. हवेली) यांनी संगनमताने महेश साठे यांचा जीव घेण्याचा कट रचला.

घटनेच्या वेळी महेश साठे हे त्यांच्या हिरो होंडा पॅशन (क्र. MH12CJ9551) मोटारसायकलवरून जात असताना आरोपींनी हुंडाई कंपनीची आय-२० (क्र. MH12QY7888) कारने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महेश साठे यांचा मृत्यू झाला. फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा र. नं. ५१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी अक्षय साठे याच्यावर यापूर्वीही लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अपघातासंदर्भात गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे, तर गोकुळ कोकरे याचा पूर्वइतिहास नसल्याचे समजते. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अटकेची प्रक्रिया सुरू आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे करीत असून पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे भवरापूर परिसरात खळबळ उडाली आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??