जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

यवत पोलिसात खळबळ! वरिष्ठांच्या छळाला कंटाळून पोलिस कर्मचाऱ्याची काळीज चिरणारी पोस्ट ; मुलीच्या वाढदिवशी वडिलांची हताश हाक…

यवत (ता. दौंड) : यवत पोलीस ठाण्यातील अंतर्गत कारभार, वरिष्ठांची मनमानी आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवरील अन्याय या सर्वांचा एकाचवेळी भांडाफोड करणारी धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांनी त्यांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवशी उपस्थित राहता येत नसल्याचे दुःख व्यक्त करत सोशल मीडियावर टाकलेली काळीज चिरणारी पोस्ट अचानक व्हायरल झाली आणि परिसरात खळबळ उडाली. या पोस्टमध्ये त्यांनी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख गेल्या वर्षभरापासून सातत्याने मानसिक छळ करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोस्ट पाहिल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी थरथर कापणारी परिस्थिती अनुभवली असून सहकाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रणदिवे यांनी लिहिलेली पोस्ट अत्यंत वेदनादायी असून त्यातून पोलिस कर्मचारी झालेल्या मानसिक त्रासाचे जिवंत चित्र उमटते. त्यांनी म्हटले आहे, “दिदी, आज तुझा पहिला वाढदिवस… मला तुझ्यासोबत साजरा करायचा होता. पण मी पोलीस आहे, येथे वरिष्ठांची मनमानी चालते. तू आजारी असताना मला जबरदस्ती नाशिक, जळगाव, अहमदनगर येथे पाठवले गेले, तुला हॉस्पिटलला घेऊन जाण्यासही मिळाले नाही. यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी नारायण देशमुख मला वर्षभर त्रास देत आहेत. माझा नाविलाज झाला आहे. मी माझ्या जीवाचे बरेवाईट करत आहे. ही तुझ्यासाठी पहिली आणि शेवटची शुभेच्छा.”

या पोस्टमधील “पहिली आणि शेवटची शुभेच्छा” या शब्दांनी रणदिवे यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्याने ते कुठे आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे त्यांच्या जीविताबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सहकारी पोलिस, मित्र आणि नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर यवत परिसरात संताप आणि चिंता यांचे वातावरण आहे.

दरम्यान वरिष्ठ निरीक्षक नारायण देशमुख यांना या प्रकरणाबाबत विचारले असता त्यांनी संपूर्ण आरोप नाकारत, “पोस्टमधील सर्व आरोप निराधार आहेत. रणदिवे यांचा शोध घेण्यासाठी पथक पाठवले आहे,” असे उत्तर दिले. मात्र नागरिक आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांना देशमुख यांचे उत्तर समाधानकारक वाटले नाही.

यवत पोलीस ठाण्यातील काही मागासवर्गीय पोलिसांवर वरिष्ठांकडून मनमानी आदेश, अन्याय, बदनामी, अकारण बदल्या आणि मानसिक छळ होत असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरु आहे. काही अधिकारी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार दखल घेण्याच्या प्रकरणांत विलंब करतात, तर फिर्यादींना अनावश्यक त्रास दिल्याचेही आरोप आहेत. आरोपींना आर्थिक तडजोड करून वाचवले जाते, तर कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते, असे बोलले जाते.

अलीकडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा मोडतोड प्रकरणात एका मागासवर्गीय पोलिसाने स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोपीला पकडले होते. मात्र त्याचा सन्मान करण्याऐवजी त्यालाच दुजाभाव आणि अपमानास्पद वागणूक दिल्याची चर्चा पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर आहे. ही घटना आणि रणदिवे यांची पोस्ट या दोन्ही समोर आल्यानंतर यवत ठाण्यातील अंतर्गत स्थिती किती बिघडलेली आहे याची स्पष्ट झलक मिळते.

यवत परिसरातील नागरिकांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी, वरिष्ठांच्या कार्यपद्धतीचे परीक्षण, संपत्ती व आर्थिक व्यवहारांची तपासणी आणि तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “देशमुखशाही आता थांबलीच पाहिजे,” असा आवाज नागरिकांमधून उघडपणे उठू लागला आहे.

निखिल रणदिवे यांचा शोध लागेपर्यंत आणि त्यांची प्रकृती व सुरक्षितता स्पष्ट होईपर्यंत संपूर्ण परिसरात भीतीचे सावट कायम आहे. मुलीच्या पहिल्या वाढदिवशी वडिलांनी लिहिलेली “शेवटची शुभेच्छा” ही ओळ केवळ भावनिक नाही; तर पोलीस दलातील जुलूम, अन्याय, मानसिक छळ आणि व्यवस्थेतील गंजलेले अंधारलेले चेहरे यांचा निर्दय पर्दाफाश करणारी आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री. धनंजय काळे 📞 9665221813 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??