महाराष्ट्र

कारागृहातील टेंडर प्रकरणी ! तत्कालीन अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांचे स्पष्टीकरण..

पुणे : स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राज्यातील कारागृहात तत्कालीन अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta IPS) आणि पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर (Dr.Jalinder Supekar IPS) यांच्या काळात ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

त्यावर स्पष्टीकरण देताना अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही. आपली बदली झाल्यानंतर ही टेंडर प्रक्रिया झाली आहे.

राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कारागृहात रेशन आणि उपाहारगृहामधून कैद्यांसाठी घेतले जाणारे धान्य व अन्य वस्तूंचे खुल्या बाजारात असलेल्या दरांपेक्षा दुप्पट ते तिप्पट किंमतीला खरेदी करण्यात आले. तसेच विद्युत उपकरणेही अव्वाच्या सव्वा किंमतीला खरेदी करण्यात आले आहे. ही टेंडर प्रक्रिया २०२४ ते २०२५ मधील आहेत. त्यातील विद्युत उपकरण खरेदीत बाजारभावापेक्षा १०२ कोटी रुपये अधिक मोजण्यात आले असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. राजू शेट्टी यांनी हा ५०० कोटी रुपयांचा घोटाळा अमिताभ गुप्ता आणि पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळात घडला असल्याचे म्हटले असून त्याच्या चौकशीची मागणी केली आहे.

याबाबत अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, ही टेंडर प्रक्रिया आपली बदली झाल्यानंतर राबविण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्याशी आपला काही संबंध नाही.

अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची पुणे पोलीस आयुक्तपदावरुन १५ डिसेंबर २०२२ मध्ये कारागृह महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली होती. तेथे जवळपास दोन वर्षे काम केल्यानंतर त्यांची जुलै २०२४ मध्ये मुंबई येथे बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची ८ ऑक्टोंबर २०२४ रोजी प्रतिनियुक्तीवर इंडो तिबेट बॉर्डर पोलीसच्या पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??