जिल्हाराजकीय

राजकारणी, अधिकारी आणि ठेकेदार यांचे साटेलोटे ; राजेंद्र साळवे. अध्यक्ष अखिल मांजराई नगर नागरिक कृती समिती..

दोन आमदार पण काम अपुर्ण....

पुणे (हडपसर) : (१५ नंबर चौक) ते मांजरी बुद्रुक रस्त्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू असून आणखीन पुर्ण झाले नाही. या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर साधे विजेचे खांबही नसल्याने वाहन चालकांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास रेल्वे ब्रिज जवळ अक्षरशा वाहन चालकांना कसरत करावी लागते.

                        दोन आमदार पण काम पूर्ण नाही…

हडपसर मतदारसंघात दोन आमदार आहेत. विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे चेतन तुपे तर विधान परिषदेत भाजपचे आमदार योगेश टिळेकर आहेत. विषेश म्हणजे हे दोन्ही आमदार सत्ताधारी पक्षाचे असूनही या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने महादेव नगर, ढेरे बंगला, गोपाळ पट्टी, अतुल टकले नगर ते मांजरी बुद्रुक परिसरातील नागरिक आमदारांवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. यातूनच स्थानिक रहिवासी संताप व्यक्त करत आहेत. हडपसर मांजरी रस्त्याचे काम दोन टप्प्यात सुरू आहे. हडपसर ते मांजरी रेल्वे स्टेशन उड्डाणपुलापर्यंत राज्य सरकारच्या बांधकाम विभागाकडून केले जात आहे. दुसऱ्या टप्प्यात मांजरी रेल्वे स्टेशन ते मांजरी स्मशानभूमी नदीच्या पुलापर्यंतचे काम पीएमआरडीएकडून केले जात असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. मांजरी गावाचा समावेश पुणे महापालिकेत झाला असल्याने या रस्त्याच्या कामासाठी पुणे महापालिकेने निधी उपलब्ध करून दिला गेला पाहिजे, असे स्थानिक पुढार्याचे म्हणणे आहे.

                          तीन तिघांडा काम बिघाडा….

पीएमआरडीए, बांधकाम विभाग आणि आता महापालिका या तीन यंत्रणांतील समन्वयाच्या अभावामुळे सदर रस्त्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. महापालिकेच्या हद्दीत मांजरी गावाचा समावेश झाल्यानंतर रस्त्यांसह पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र अर्धवट कामे कोणी पूर्ण करावी, यासाठी एकही यंत्रणा जबाबदारी घ्यायला तयार नाही. यात केवळ गावकरी भरडले जात आहोत, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

               भूसंपादनाचा मोबदला न देताच रस्त्याचे काम, ठेकेदार मस्त…

या रस्त्याचे जे काम झाले, ते निकृष्ट दर्जाचे आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या कामाच्या माध्यमातून केवळ ठेकेदाराचे भले केले आहे. यात राजकारण्यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कोणतेही विकास काम करताना त्यात नागरिकांचे नुकसान होणार असेल तर त्यांना योग्य मोबदला दिला जातो. त्यानंतर भूसंपादन केले जाते. मात्र या बाबतीत उलटा कारभार करण्यात आला आहे. भूसंपादन न करताच ठेकेदाराने काम सुरू केले. त्यामुळे अनेकांना मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत पडून आहे, असे अनेक नागरिकांनी बोलताना सांगितले.

                           कामाचा दर्जा निकृष्ट…

कोट्यवधी रुपये खर्चून होत असलेल्या या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत आहे. या कामाकडे पीएमआरडीए प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कामाचा कालावधी संपल्यावर अनेकदा मुदत वाढवण्यात आली. अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात समन्वय नसल्याने कामाची गुणवत्ता ढासळली आहे. पदपथ, ड्रेनेज, चेंबर, दुभाजक ठिकठिकाणी तुटले आहेत. कोणतेही काम सलग होत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते…

                       रस्त्यावरच दुतर्फा वाहनांची पार्किंग….

हडपसर-मांजरी रस्ता दोन्ही बाजूला प्रत्येकी २० फूट रुंद केला जात आहे. घुले वस्ती ते गोपाळ पट्टीपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होईल, असे वाटत असतानाच रस्त्यावर नागरिकांकडून चार चाकी गाड्या, पाण्याचे टॅकर, स्कूल बस तसेच बंद पडलेली वाहने पार्क केली जातात. त्यामुळे वाहनचालकांना २० फुटाच्या रस्त्यातून केवळ १० फुटी रस्त्यातून खबरदारीने डोळ्यात तेल घालून मार्ग काढावा लागत आहे. हे कमी म्हणून की काय, रस्त्यावर भाजी विक्रेत्यांची नित्याचीच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत असून यामुळे अनेक वेळा रस्त्यावर वाहन चालकांना मारहाणीचे प्रकार घडत असतात.

 राजेन्द्र साळवे, अध्यक्ष अखिल मांजराई नगर, नागरीक कृती समिती… 

हडपसर-मांजरी रस्त्याचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे, हे समजत नाही. जबाबदारीची टोलवाटोलवी केली जात आहे. भूसंपादन न करता रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. अनेकांना मोबदला देखील मिळाला नाही. राजकारणी, अधिकारी आणि ठेकेदार यांचे साटेलोटे आहे की काय असा संशय बळावत असल्याचे खाजगीत नागरिक बोलत आहेत. तीन ही प्रशासनाने वेळीच रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा मोठे जन आंदोलन केले जाईल.

                            कोणाला काम अपुर्ण हवे ?….

पीएमआरडीए प्रशासनाने ठेकेदाराला पाठीशी घालणे बंद केले तरच रेल्वे उड्डाणपूल ते मुळा-मुठा नदीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासह काँक्रिटीकरणाचे काम तातडीने पूर्ण होईल. रेल्वे उड्डाणपूल ते स्मशानभूमी या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण काही प्रमाणात झाले आहे, तर काही ठिकाणी खड्याचे साम्राज्य आहे. ठेकेदाराने बहुतेक ठिकाणी अर्धवट काम केले असल्याचे प्राथमिक दिसून येत आहे. मध्येच ब्लॉक असल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. विद्यार्थी आणि कामगारांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या सुरुवातीला आणि शेवटी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी चेंबर खचले आहेत. विद्युत खांब, डीपी अद्याप रस्त्यातच आहेत. पदपथ सलग नाहीत. दुभाजक तुटून रस्त्यावर पडले आहेत. धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

चेतन तुपे, आमदार, हडपसर विधानसभा मतदारसंघ….काय म्हणाले.. 

मांजरी गावाचा समावेश महापालिकेत झाल्यापासून या भागात विकास करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. रस्त्याचे काम रखडले आहे, तर त्यासाठी निधीची तरतूद करणे आवश्यक आहे.

योगेश टिळेकर, आमदार, विधान परिषद, भाजप काय म्हणाले….. 

हडपसर-मांजरी रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे. मांजरी गावातील कॉर्नरजवळ भूसंपादन करणे बाकी आहे. रस्त्यावर विद्युत खांब बसवण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. दुभाजकामध्ये गार्डन करण्याआधी या कामासाठी निधी मागितला आहे. लवकरच हे काम मार्गी लागून रस्ता पूर्णपणे तयार होईल.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री. धनंजय काळे 📞 9665221813 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??