महाराष्ट्रशिक्षण

सर्व शाळांमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गाणे बंधनकारक, शिक्षण विभागीय उपसंचालक शाळांवर ठेवणार नजर…

राज्यगीत गाणे बंधनकारक महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! राज्यातील सर्व शाळांमध्ये 'हे' गीत गावे लागणार...

मुंबई : राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत सक्तीने वाजवले जाईल, असा स्पष्ट आदेश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे. या निर्णयामागचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत अभिमान जागवणे आणि एकात्मतेची भावना दृढ करणे हा आहे.

राज्य सरकारने या गीताच्या अनिवार्यतेसंदर्भात आधीही सूचना दिल्या होत्या, मात्र आता त्याची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्यात येणार आहे.

मागील वर्षी शाळांमध्ये सक्तीने हे गीत वाजवले जावे, याबाबत आदेश दिले गेले होते. यंदा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी त्या निर्णयाची व्याप्ती वाढवत, केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डांच्या शाळांनाही या आदेशात सामील केले आहे. राज्याच्या शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) रमाकांत काठमोरे यांनी सर्व विभागीय उपसंचालकांना या आदेशाच्या अंमलबजावणीसंदर्भात जबाबदारी सोपवली आहे.

                               राज्यगीत गाणे बंधनकारक

या गीताची ओळख अधिक सखोल आहे. ‘काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी…’ अशा ओळींमधून राज्यातील नागरिकांची निर्भीड वृत्ती आणि अभिमान व्यक्त केला जातो. हे गीत प्रसिद्ध गीतकार राजा बढे यांनी लिहिलं असून, श्रीनिवास खळे यांचे संगीत आणि शाहीर साबळेंचा आवाज यामुळे ते आजही लोकांच्या मनात घर करून आहे.

शालेय वेळापत्रकानुसार, दररोज सत्र सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत, परिपाठ, प्रार्थना, प्रतिज्ञा यांसोबत राज्यगीतही गायले जाणे बंधनकारक आहे. यापूर्वी सर्व शाळांना या संदर्भात वेळोवेळी सूचित करण्यात आले होते, मात्र अनेक शाळांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे शिक्षण विभागाच्या निरीक्षणात आले आहे. त्यामुळे आता जिल्हानिहाय अहवाल मागवण्यात येणार आहे.

                                शिक्षण विभाग ठेवणार नजर

राज्य शिक्षण विभागाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, सर्व माध्यमांच्या, सर्व प्रकारच्या व्यवस्थापनांतील शाळांमध्ये राज्यगीत गायलेच पाहिजे. यावर विभागीय उपसंचालक कटाक्ष ठेवणार असून, प्रत्येक शाळेने हे गीत वाजवले जाते की नाही, याचा तातडीने अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

या निर्णयामुळे आता राज्यातील सर्व शाळांमध्ये सकाळच्या सत्राची सुरुवात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गर्जना करणाऱ्या गीताने होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये राज्याविषयी अभिमानाची भावना वाढवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं ठरणार आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??