जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

तलाठी–तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर ‘दक्षता पथकांचा वॉच’, महसूल विभागातील अनियमिततेवर राज्य सरकारचे कडक पाऊल… वाचा सविस्तर

मुंबई : महसूल विभागातील वाढत्या तक्रारी, जमीन व्यवहारातील अनियमितता, मोजणीतील त्रुटी, गौण खनिजातील गोंधळ आणि विविध महसूल कामकाजात वाढत चाललेल्या भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त स्तरावर सात दक्षता पथके स्थापन करण्यात आली असून, या पथकांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यस्तरावर उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. गुरुवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी झाला.

महसूल विभागाला नागरिकांचा विश्वास परत मिळवून देणे, जनसेवा सुलभ करणे आणि महसूलाशी संबंधित तक्रारींना वेळेत न्याय मिळवून देणे, हा या निर्णयामागील मुख्य हेतू आहे. विशेष म्हणजे जमीन मोजणी, गौण खनिज, मुद्रांक शुल्क, भूमी अभिलेख, तसेच महसूल अधिकाऱ्यांविरोधात नोंदविल्या जाणाऱ्या गंभीर तक्रारींची तातडीने आणि निष्पक्षपणे चौकशी होणे अत्यावश्यक मानून ही पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक विभागीय आयुक्ताने पुढील १५ दिवसांत आपल्या कार्यक्षेत्रात दक्षता पथक उभे करणे बंधनकारक केले आहे.

दक्षता पथकात अपर आयुक्त (महसूल) हे अध्यक्ष तर उपजिल्हाधिकारी (महसूल) हे सदस्य सचिव असतील. तसेच उपजिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी, सह जिल्हा निबंधक, तहसीलदार दर्जाचे अधिकारी असे विविध तज्ज्ञ सदस्य पथकात समाविष्ट केले जाणार आहेत. चौकशी दरम्यान किमान चार अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे, ज्यामुळे एकतर्फी तपासणी, दबाव किंवा मनमानीला पूर्णविराम मिळणार आहे. आवश्यकतेनुसार हे पथक आपल्या विभागाबाहेर जाऊन तपासणी करण्याचे अधिकारही राखून ठेवले आहेत.

शासनाने ठरविलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे, महसूल विभागाविरोधातील कोणतीही तक्रार पथकापर्यंत पोहोचल्यावर केवळ ३० दिवसांत प्राथमिक अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. तक्रार गंभीर स्वरूपाची असल्यास हा कालावधी फक्त १५ दिवसांचा करण्यात आला आहे. अशा प्रकारे तक्रारींची चौकशी लांबवण्याची, कागदपत्रे लपवण्याची किंवा तपास टाळण्याची प्रथा मोडून काढण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. याच संदर्भात, पथकाने मागितलेली कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून न दिल्यास त्या कार्यालय प्रमुखावरच थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. चौकशीत तथ्य आढळल्यास दोषी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर “महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९” नुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.

दक्षता पथकांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात अपर मुख्य सचिव (महसूल), एक सहसचिव आणि तीन उपसचिवांचा समावेश असून, पथकांच्या अहवालांचा आढावा घेणे, गरजेनुसार सुधारणा सुचवणे आणि संपूर्ण व्यवस्थेचा प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे अशी जबाबदारी या समितीकडे असेल.

या निर्णयावर बोलताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, “महसूल विभाग थेट जनतेशी निगडित असल्याने पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे अत्यावश्यक आहे. दक्षता पथकांमुळे जमीन, मोजणी, गौण खनिज, मुद्रांक आणि अन्य कामकाजाशी संबंधित तक्रारींची चौकशी अधिक वेगवान, निष्पक्ष आणि परिणामकारक होईल. यामुळे प्रशासनाची विश्वासार्हता नक्कीच वाढेल.”

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महसूल विभागातील अनियमिततेवर मोठा लगाम बसणार असून, नागरिकांना पारदर्शक आणि जबाबदार महसूल प्रशासन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??