जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

मुद्रांक शुल्क परतावा बंद! विकास करार रद्द झाला तरी पैसे मिळणार नाहीत; सरकारचा मोठा निर्णय…

मुंबई, दि. ३० : राज्य सरकारने महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात महत्त्वाची सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असून, विकास करार (Development Agreement) रद्द, निरस्त किंवा समाप्त झाल्यास भरलेल्या मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा कोणतीही सवलत मिळणार नाही, अशी स्पष्ट तरतूद करणारे विधेयक महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले.
सरकारच्या म्हणण्यानुसार, राज्याच्या महसुलाचे संरक्षण करणे आणि कायद्यातील पळवाटांचा गैरवापर रोखणे हा या सुधारणेचा मुख्य उद्देश आहे.

सध्या विकास करारांवर मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क भरले जाते. मात्र, व्यावसायिक कारणे किंवा परस्पर मतभेदांमुळे अनेक करार नंतर रद्द केले जातात. त्यानंतर भरलेल्या मुद्रांक शुल्काच्या परताव्यासाठी शासनाकडे अर्ज करण्यात येतात. अशा प्रकरणांमध्ये तथ्य पडताळणी करताना प्रशासकीय अडचणी निर्माण होत असून परताव्याच्या दाव्यांमध्येही मोठी वाढ होत असल्याचे सरकारने नमूद केले आहे.

मुद्रांक शुल्क हे दस्ताच्या अंमलबजावणीवर आकारले जाते. कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली किंवा नाही, यावर त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळे करार रद्द झाल्यानंतरही शुल्काचा परतावा देणे राज्याच्या महसुलासाठी नुकसानकारक ठरत असल्याचे सरकारचे मत आहे.

यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम ४८ मध्ये सुधारणा करून, विकास करारांसह समान मुद्रांक शुल्क लागू असलेल्या इतर दस्तांनाही परतावा किंवा सवलतीची तरतूद लागू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे विकास करार रद्द झाल्यानंतर मुद्रांक शुल्क परत मिळणार नाही. त्यामुळे करार करण्यापूर्वी संबंधित पक्षांनी अधिक काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक ठरणार आहे. सरकारच्या मते, या सुधारणेमुळे राज्याच्या महसुलाचे संरक्षण होईल, कायद्यातील पळवाटा बंद होतील आणि मुद्रांक शुल्क व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येईल.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??