जिल्हाशिक्षणसामाजिक

स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यासाची गरज : उपजिल्हाधिकारी गंगाधर होवाळे

हडपसर (पुणे) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने गुरुवार (दि. ४ सप्टेंबर २०२५) रोजी “स्पर्धा परीक्षांमधील यश आणि आव्हाने” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी गंगाधर होवाळे तर अध्यक्षस्थानी एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपजिल्हाधिकारी गंगाधर होवाळे म्हणाले की, “स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळवायचे असेल तर सातत्यपूर्ण व नियोजनबद्ध अभ्यास अत्यावश्यक आहे.” ते पुढे म्हणाले की, “घरची आर्थिक परिस्थिती साधारण असली तरी मी या महाविद्यालयात कॉमर्स विभागातून शिक्षण घेतले आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून प्रेरणा घेतली. महाविद्यालयाच्या वाचन कक्ष व ग्रंथालयाच्या मदतीने मी दहा-बारा तास अभ्यास करू शकलो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास खडतर आहे; मात्र सातत्य ठेवले तर यश निश्चित मिळते.”

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “महाविद्यालयातील मार्गदर्शन केंद्रातून अनेक विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश मिळवले असून उपजिल्हाधिकारी गंगाधर होवाळे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श ठेवून तयारी करावी.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. छाया सकटे यांनी केले. समन्वयक प्रा. अजित भोसले यांनी आभार मानले, तर प्रा. दीपक गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिनकर मुरकुटे तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??