जिल्हाशिक्षणसामाजिक

रयत शिक्षण संस्थेमार्फत ‘रयत अविष्कार संशोधन प्रकल्प २०२५’ स्पर्धेचे भव्य आयोजन…

हडपसर : रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या वतीने आयोजित ‘रयत अविष्कार संशोधन प्रकल्प २०२५’ या भव्य संशोधन स्पर्धेचे आयोजन एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. संशोधन, नवकल्पना व कौशल्यविकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमास शैक्षणिक, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन चंद्रकांत दळवी (IAS निवृत्त), सचिव विकास देशमुख (IAS निवृत्त), कुलगुरू प्रिं. डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सहसचिव प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, रजिस्ट्रार डॉ. विजय कुंभार, प्रिं. डॉ. सुरेश साळुंखे, प्र. प्राचार्य डॉ. एकनाथ मुंढे, अरविंद तुपे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाबरोबरच संशोधन क्षेत्रात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. “आजचे युग तंत्रज्ञानाचे आणि तीव्र स्पर्धेचे आहे. संशोधनाभिमुख दृष्टिकोनातूनच उज्ज्वल करिअर घडते. केवळ पदव्या मिळवून चालणार नाहीत; बदलत्या काळानुसार विविध कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय सेवा, व्यावसायिक क्षेत्र आणि उद्योजकता या सर्व मार्गांवर आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

कुलगुरू प्रिं. डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी रयत शिक्षण संस्थेच्या संशोधनाभिमुख उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन, तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि संशोधनवृत्ती विकसित करावी, असे आवाहन केले. “रयत अविष्कारसारखे उपक्रम सक्षम संशोधक घडविण्यासाठी भक्कम व्यासपीठ देतात,” असे ते म्हणाले.

या स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांतील ६८२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमादरम्यान ‘अविष्कार संशोधन प्रकल्प’ या गोषवार्‍याचे (Proceedings) प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘प्लॅन्ट अँड ह्युमन वेलफेअर’ (डॉ. विलास कांबळे व डॉ. शुभांगी वास्के), ‘मास्तरांची सावली : सहजीवनाची सामाजिकी’ (डॉ. शीतल चौरे) आणि ‘जेलर ते प्राध्यापक’ (डॉ. अतुल चौरे) या ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव विकास देशमुख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय रजिस्ट्रार डॉ. विजय कुंभार यांनी करून दिला, तर स्पर्धेच्या समन्वयक प्रो. डॉ. रंजना जाधव यांनी आभार मानले.

समारोपप्रसंगी सहसचिव प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्र. प्राचार्य प्रो. डॉ. एकनाथ मुंढे, आयक्यूएसी समन्वयक प्रा. संजय अहिवळे, उपप्राचार्य प्रो. डॉ. किशोर काकडे, प्रो. डॉ. दिनकर मुरकुटे, डॉ. संजय जगताप, प्रो. डॉ. रंजना जाधव यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. संशोधन संस्कृतीला चालना देणारा ‘रयत अविष्कार’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात प्रेरणादायी ठरला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री. धनंजय काळे 📞 9665221813 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??