कृषी व्यापारजिल्हादेश विदेशमहाराष्ट्र

‘रसायन अवशेष मुक्त शाश्वत शेती’ प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन, आयोजन ६ मार्च ते १० मार्च यादरम्यान ; वाचा सविस्तर…

भारतातील पहिलं 'रासायनिक अवशेषमुक्त शाश्वत शेती प्रदर्शन'!

पुणे : आपण जो भाजीपाला खातो तो रेसिड्यू फ्री आहे का? त्यामध्ये किती टक्के रसायनं किंवा विष आहे? हा विचार आपण कधी केलाय? नाही ना…? या सर्व प्रश्नांकडे डोळे उघडे ठेवून पाहायला लावणारं कृषी प्रदर्शन पुणेकरांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि प्रत्येक नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलंय.

                      पुणे कृषी महाविद्यालयाने हा पुढाकार घेतलाय.

देशातीच पहिलेच रेसिड्यू फ्री म्हणजेच ‘रसायन अवशेष मुक्त शाश्वत शेती’ प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पुणे कृषी महाविद्यालयाच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीसाठी प्रोत्साहित करणे आणि ‘फॅमिली फार्मर’सारखी एक अभूतपूर्व संकल्पना रूजण्यासाठी या प्रदर्शनातून जनजागृती करण्यात येणार आहे.

                                            उद्देश
शेतीमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय खतांचा वापर वाढावा आणि शेतकऱ्यांना रासायनमुक्त शाश्वत शेती पद्धती अवलंबण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि साधनांची माहिती देणे हाच या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे.

शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय, रेसिड्यू फ्री आणि शाश्वत शेतीचा अवलंब केला पाहिजे, नागरिकांना रेसिड्यू फ्री, केमिकलमुक्त, सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न खायला मिळालं पाहिजे, यासोबतच शहरातील प्रत्येकाला आपण काय खातोय? याचा अंदाज आला पाहिजे यासंदर्भातील जागृती व्हावी आणि शेतकऱ्यांनी रासायनिक अवशेषमुक्त शाश्वत शेतीचा मार्ग स्विकारावा हाच उद्देश या प्रदर्शनाचा आहे.

                                      ‘फॅमिली फार्मर’
जसा प्रत्येक कुटुंबासाठी एक फॅमिली डॉक्टर ठरवलेला असतो त्याप्रमाणे फॅमिली फार्मर का नको? ज्याप्रमाणे आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला आपण डॉक्टरला पैसे देतो त्याप्रमाणेच आपण रोज खातो ते अन्न रसायनमुक्त आणि ताजे असावे यासाठी आपण थेट शेतकऱ्यांना का पैसे देत नाही? फॅमिली डॉक्टरप्रमाणे फॅमिली फार्मर ही संकल्पना राबवण्यासाठी या प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने जनजागृती केली जाणार आहे.

                              काय असेल प्रदर्शनात?
या प्रदर्शनामध्ये ५० पेक्षा जास्त रेसिड्यू फ्री पिकांचे प्रात्यक्षिके पाहायला मिळणार असून, राज्यातील कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, कृषी विभाग आणि कृषी क्षेत्राशी संलग्न विभाग यामध्ये सहभागी होणार आहेत.

हायटेक शेती, पॉलिहाऊसमध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध पिकांची शेती, हायड्रोपोनिक शेती, एरोफोनिक शेती, नर्सरी तंत्रज्ञान, विद्यापिठाने, महाविद्यालयाने आणि कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेले एआय तंत्रज्ञान आधारित मोबाईल अॅप, शेती क्षेत्रातील एआय तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान पाहण्याची संधी मिळणार आहे.

गांडूळ खत प्रकल्प, बायोचार प्रकल्प, कंपोस्ट खत, अशा नानाप्रकारच्या प्रयोगांचे प्रात्यक्षिके आणि रासायनिक अवशेष मुक्त कृषी तंत्रज्ञान, जैविक कृषी पध्दती, मातीचे आरोग्य व्यवस्थापन आणि रासायनिक तणनाशक, किटकनाशकांचा वापर कमी करून, लागवड खर्चात बचत करून उत्पादन वाढविणाऱ्या शेती पध्दतीचे प्रात्यक्षिके असणार आहेत.

रानभाज्या महोत्सव, जुगाड, सन्मान अन् बरंच काही
देशी आणि गावरान रानभाज्यांची पुणेकरांना माहिती व्हावी यासाठी खास रानभाज्यांचे प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या नवउद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी घरीच बनवलेले जुगाड या ठिकाणी पाहायला मिळणार असून राज्याच्या कृषी विभागाने कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा सन्मानही यावेळी केला जाणार आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे.

                                    कधी आणि कुठे?
पुणे कृषी महाविद्यालयाच्या फिल्डवर या प्रदर्शनाचे आयोजन ६ मार्च ते १० मार्च यादरम्यान केले आहे. पुणेकरांना आणि नागरिकांना हे प्रदर्शन पाहण्याची संधी मिळणार आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री. धनंजय काळे 📞 9665221813 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??