महाराष्ट्र

जेजुरीच्या गाढव बाजारात कोटय़वधींची उलाढाल, बाजारात आंध्र प्रदेशच्या व्यापाऱ्यांना बंदी… सविस्तर माहिती घ्या जाणून…

पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये पौष पौर्णिमेनिमित्त पारंपरिक गाढव बाजार भरला आहे. दोन दिवसांपासून भरलेल्या गाढव बाजारामध्ये कोटय़वधी रुपयांची उलाढाल झाली. गावठी गाढवांना तीस ते चाळीस हजार रुपये, तर काठेवाडी गाढवाला एक लाख रुपयांचा भाव मिळाला.

        राज्याच्या विविध भागातून वैदू, पैकाडी, कोल्हाटी, कुंभार, माती वडार, मदारी, डोंबारी, गारुडी आदी समाज बांधव गाढव खरेदीसाठी जेजुरीत मुक्कामी आले आहेत. बाजारात सहाशे गावठी गाढवे, तर गुजरातमधील काठेवाड, राजकोट, सौराष्ट्र, भावनगर, अमरेली आदी भागातून शंभरच्या वर काठेवाडी गाढवे व्यापाऱ्यांनी विक्रीस आणली होती. ही गाढवे गावठी गाढवांच्या तुलनेत दिसायला उंची पुरी व कामाला दणकट असतात. एकावेळी ५० ते ६० किलोचा बोजा वाहून नेण्याची त्यांची क्षमता असते. त्यामुळे त्यांची किंमत जास्त असते. खरेदीसाठी आलेले व्यापारी दात पाहूनच किंमत ठरवतात. दोन दाताच्या गाढवांना दुवान, चार दाताच्या गाढवांना चौवान, कोरा, अखंड जवान असे निकष लावले जातात.

       आधुनिक यंत्र युगामध्ये गाढवांचे महत्त्व कमी होऊ लागले आहे; मात्र डोंगरदऱ्यांमध्ये, अडचणीच्या ठिकाणी सिमेंट, वाळू, मुरूम व इतर अवजड सामान वाहून नेण्यासाठी गाढवांची गरज लागतेच. प्रामुख्याने वीटभट्टी, बांधकाम व शेतीच्या कामासाठी अजूनही गाढवांचा उपयोग केला जात आहे. अनेक आजारांवर गाढविणीचे दूध औषध म्हणून वापरले जाते. या दुधाचा भावही साडेतीन ते चार हजार रुपये लिटर असतो. गाढव बाजारात खरेदी-विक्रीचे अनेक व्यवहार उधारीवर झाले. कोणतीही लिखापडी न करता विश्वासावरच पुढच्या बाजारच्या वेळी पैसे दिले जातात. नगर जिह्यातील मढी व धाराशिव जिह्यातील सोनोरी येथे असेच पारंपरिक गाढव बाजार भरतात. जेजुरीच्या गाढव बाजाराला जागा कमी पडत असल्याने भटक्या विमुक्त समाज बांधवांमध्ये नाराजी आहे. सोमवारी मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रामा यल्लप्पा काळे यांनी दिली.

                आंध्र प्रदेशच्या व्यापाऱ्यांना बंदी

       काही वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातून अनेक व्यापारी मांस विक्रीसाठी गाढव खरेदी करीत होते; मात्र हे लक्षात आल्याने आम्ही संघटित होऊन त्यांच्या या प्रकाराला विरोध केला. त्यामुळे ते व्यापारी आता इकडे फिरकत नाहीत. केवळ व्यवसायासाठीच आम्ही गाढवांचे खरेदी विक्री व्यवहार करतो, असे सुभाष गायकवाड यांनी सांगितले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??