देश विदेश

नवा कसोटी कर्णधार, तर उपकर्णधारपदी नवीन खेळाडू ; इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर… वाचा संपूर्ण सविस्तर !

संपादक – सुनिल थोरात

मुंबई : आयपीएलनंतर भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून यावेळी पाच कसोटी सामन्यांची मालिक खेळवण्यात येणार आहे. यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीद्वारे भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने नव्या कर्णधाराची देखील घोषणा यावेळी केली आहे.

                 कसोटी संघ असा राहणार…

शुभमन गिल (C), ऋषभ पंत (VC, WK), यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (WK), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव

    कोण आहे कसोटी संघाचा नवा कर्णधार?

बीसीसीआयने शुभमन गिलच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घातली आहे. गिलने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होतं. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने ४५ आणि ३५* धावांची खेळी होती. शुभमन गिलने आतापर्यंत २५ कसोटी सामने खेळले असून १४९७ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ५ शतके आणि ७ अर्धशतके झळकावली आहेत.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे…

दरम्यान, २० जूनपासून भारत आणि इंग्लंड संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यापैकी पहिली कसोटी २०-२४ जून (लॉर्ड्स), दुसरा कसोटी सामना २ ते ६ जुलै (बर्मिंगहॅम), तिसरा कसोटी सामना १० ते १४ जुलै (लॉर्ड्स), चौथा कसोटी सामना २३ ते २७ जुलै (मँचेस्टर) आणि पाचवा कसोटी सामना ३१ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान (ओव्हल, लंडन) खेळवला जाणार आहे.

        WTC च्या नव्या पर्वाची सुरुवात…

महत्त्वाचे म्हणजे भारताचा इंग्लंड दौरा दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण भारत आणि इंग्लंड या कसोटी मालिकेतून वर्ल्ड
टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ पर्वातील मोहिमेची सुरुवात करणार आहेत. त्यामुळे पहिल्याच कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असणार आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??