जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

नोटरीवर झालेले जमीन व्यवहारही कायदेशीर ; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा…

मुंबई : राज्य शासनाने छोट्या भूखंडांच्या अनियमित व्यवहारांना कायदेशीर स्वरूप देत ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. तुकडेबंदी कायद्यानुसार बेकायदेशीर ठरलेल्या लाखो जमीन व्यवहारांना आता कोणतेही शुल्क न आकारता नियमित करण्याची कार्यपद्धती महसूल विभागाने निश्चित केली असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत सर्व प्रशासकीय यंत्रणेला तातडीने आदेश जारी केले आहेत.

या निर्णयाचा राज्यातील ६० लाख कुटुंबांवर आणि सुमारे ३ कोटी नागरिकांवर थेट परिणाम होत असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महसूल विभागाने जारी केलेल्या नवी कार्यपद्धतीनुसार १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत झालेल्या तुकडेबंदीविरुद्धच्या जमीन व्यवहारांना कायदेशीर मान्यता दिली जाणार आहे. अनेक वर्षांपासून सातबाऱ्यावर “तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार” असा झालेला शेरा नागरिकांसाठी अडथळा ठरत होता. आता हा शेरा कायमस्वरूपी काढून टाकला जाईल.

यापूर्वी दंड कमी करूनदेखील नागरिक पुढे येत नसल्याने, शासनाने कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता हे व्यवहार थेट नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे—ज्यांची जमीन ‘इतर हक्कात’ दाखल होती, त्यांना आता मुख्य कब्जेदार म्हणून नोंदवले जाईल. तसेच यापूर्वी फेरफार नाकारला असल्यास, तो पुन्हा तपासून मंजूर केला जाईल.

नोटरी आणि स्टॅम्प पेपरवरील व्यवहारही वैध… 

राज्यात मोठ्या प्रमाणावर जमीन व्यवहार फक्त नोटरी किंवा स्टॅम्प पेपरवरच झाले होते. अशा सर्व व्यवहारधारकांना आता दस्त नोंदणी करण्यासाठी तलाठी आणि महसूल अधिकारी मार्गदर्शन करतील. आवश्यक मुद्रांक शुल्क भरल्यानंतर संबंधितांची नावे अधिकृतपणे सातबाऱ्यावर लावली जातील.

या निर्णयामुळे अनेक वर्षे अडकून पडलेले गुंठेवारीचे व्यवहार, छोट्या भूखंडांचे मालकी हक्क, नाव नोंदणीच्या अडचणी आणि सातबाऱ्यावरील शेरा या सर्व प्रश्नांना समाधानकारक तोडगा मिळणार आहे. नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे पाऊल नागरिकाभिमुख असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

राज्यभरातील प्रलंबित लहान जमीन व्यवहारांना कायदेशीर रूप देण्यात येत असल्याने, या निर्णयाचे स्वागत होत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??