कृषी व्यापारजिल्हा

उरुळी कांचन पाटबंधारे विभाग सिंचन पाणीपट्टी वसुलीत ठरला अव्वल…

पुणे : उरुळी कांचन पाटबंधारे विभागाने तब्बल ४० लाख रुपयांची सिंचन पाणीपट्टीची वसुली करून उच्चांक गाठला आहे. शाखेच्या स्थापन वर्ष १९६९ पासूनची सर्वात जास्त सिंचन पाणीपट्टी वसुली झाल्यामुळे शाखाधिकारी, कर्मचारी यांचे परिसरात कौतुक होत आहे.

यवत चे उपविभागीय अभियंता एस. एम. साळुंखे आणि यवत अभियंता आर. के. पासलकर यांनी येथील शाखाधिकारी अर्चना जगताप तसेच गजानन डोंबाळे, महेश ढावरे, दिनेश देशमुख, अल्केश येड्रोवकर, स्वप्नील कुंजीर, सोनिया दुधाटे, सोमनाथ शितोळे या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

खडकवासला पाटबंधारे विभाग आणि यवत पाटबंधारे उपविभाग अंतर्गत उरुळी कांचन पाटबंधारे विभागाचे कामकाज चालते. १० किलोमीटर चा नवीन मुठा उजवा कालवा आणि १० किलोमीटरचा जुना मुळा -मुठा उजवा कालवा उरुळी कांचन पाटबंधारे विभागात येतो. उरुळी कांचन पाटबंधारे विभागाअंतर्गत २१ गावांचा समावेश आहे.

यामध्ये उरुळी कांचन, तरडे, शिंदवणे, अष्टापूर, शिंदेवाडी, खामगाव टेक, बिवरी, हिंगणगाव, टिळेकरवाडी, डाळींब, म्हातोबाची आळंदी, वळती आदीं गावांचा समावेश आहे. उरुळी कांचन पाटबंधारे विभागात ६ कर्मचारी कार्यरत आहेत. शाखाधिकारी अर्चना जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी सुसंवाद साधून तब्बल ४० लाख रुपयांची सिंचन पाणीपट्टीची वसुली केली.

याबाबत माहिती देताना येथील शाखाधिकारी अर्चना जगताप म्हणाल्या, की खडकवासला अंतर्गत उरुळी कांचन पाटबंधारे विभागाचा सिंचन पाणीपट्टी वसुलीबाबत प्रथम क्रमांक आला आहे. तब्बल ४० लाख रुपयांची सिंचन पाणीपट्टीची वसुली करण्यात यश आले आहे. यामागे माझ्या सर्व कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आहेत. सिंचन पाणीपट्टीची वसुली करताना सर्वच गावांतील शेतकऱ्यांनी खूप सहकार्य केले. वसुलीच्या दरम्यान शेतकऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वसुलीचे काम करण्यात आले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??