जिल्हा

दुर्दैवी घटना ! महाबळेश्वहून परतत असताना पुण्यातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू, चालकाचे नियंत्रण सुटले अन् गाडी थेट…

पुणे : होळीच्या सणादिवशी पुण्यातील लोणी काळभोर येथील तरुणांच्या गाडीचा भीषण अपघाताची घटना महाबळेश्वर वाई रस्त्यावरील पसरणी घाटात घडली आहे.

या भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे इतर दोन सहकारी गंभीररित्या जखमी झाले आहेत.

जखमींना वाईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातामध्ये मृत्यूमूखी पडलेल्या दोन तरुणांच्या घरांच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हा अपघात काल गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झाला. महाबळेश्वर वाई रस्त्यावरील पसरणी घाटात १०० मीटर दरीत कोसळून अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये अक्षय म्हस्कू काळभोर (वय २६ ), सौरभ जालिंदर काळभोर (वय २६) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर वैभव काळभोर, (वय २४ ) बजरंग पर्वतराव काळभोर (वय ३५, सर्व रा. रायवाडी, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी या अपघातामध्ये जखमी झालेल्यांची नावे आहेत. ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या या अपघाताच्या घटनेने लोणी काळभोरमधील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

                            अपघाताची घटना कशी घडली?

काल गुरुवारी १३ मार्च रोजी सायंकाळी एका चारचाकी वाहनाने चौघेजण लोणीकाळभोरच्या दिशेने निघाले होते. वाई-महाबळेश्वर रस्त्यावरील पसरणी घाटात गाडी आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी १०० फुट दरीत कोसळळी. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी चार मित्र महाबळेश्वर येथे फिरायला गेले होते. लोणीकाळभोरकडे परतत असताना ही भीषण अपघाताची घटना घडली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने चौघांना येथील एका खाजगी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, यापैकी अक्षय आणि सौरभ काळभोर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर इतर दोघांवर उपचार सुरू आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??