महाराष्ट्रराजकीय

वाटेल ती किंमत मोजायला तयार, पण सामाजिक ऐक्य जपायलाच हवं – शरद पवारांचं मोठं वक्तव्य…

नाशिक : हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर राज्यात मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने-सामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये मोठं वक्तव्य केलं.

आज (शनिवार) शरद पवार यांच्या हस्ते नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची वीण उसवली जात आहे असं दिसतंय. सामाजिक वीण जपण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तयार आहे. पण समाजामध्ये फूट पडू देणार नाही, सामाजिक ऐक्य जपायलाच हवं.”

शरद पवारांनी मांडला ऐतिहासिक संदर्भ…

यावेळी बोलताना त्यांनी दादासाहेब गायकवाड यांचा उल्लेख करत म्हटलं की, “बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे दादासाहेबांनी नोकरीचा राजीनामा देऊन समाजकारण आणि राजकारणाचा मार्ग स्वीकारला. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाकडून दादासाहेबांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडूनही आले.”

त्यांनी पुढे स्मरण केलं की, “तेव्हाचा काळ वेगळा होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत नाशिकचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व करताना यशवंतराव चव्हाण यांना चीनच्या आक्रमणाच्या काळात देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी सांभाळावी लागली होती. त्यांच्या नेतृत्वामुळे सैन्यदलाचं मनोबल उंचावलं.”

काँग्रेस-आरपीआय युतीचा दाखला…

शरद पवार म्हणाले, “दादासाहेब गायकवाड यांच्या माध्यमातून पहिल्यांदा काँग्रेससोबत आरपीआयची युती झाली. सामाजिक ऐक्य जपण्यासाठी महाराष्ट्राने केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरले, त्याचे श्रेय यशवंतराव चव्हाण आणि दादासाहेब गायकवाड या दोन्ही नेत्यांना दिलं पाहिजे.”

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??