जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

शिवरायांचे दुर्गवैभव आता जागतिक ठेवा!, सविस्तर माहिती वाचा…

पुणे : युनेस्कोने ११ जुलै २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील ११ किल्ले व तामिळनाडूतील जिंजी किल्ला ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून मान्यता दिली.

महाराष्ट्राचा अभिमान, जगाचा ठेवा!

महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचे जगभरातले महत्त्व अधोरेखित झाले आहे. युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी निगडित रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांना ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित केले.

ऐतिहासिक प्रयत्नांमुळे मिळाली मान्यता…

–या मान्यतेमागे केंद्र व राज्य शासनाचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरला.

–पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा

–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निर्णायक भूमिका

–उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची साथ

–सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी युनेस्को मुख्यालयात जाऊन तांत्रिक सादरीकरण केले

–भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा, अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक हेमंत दळवी यांचे मोलाचे योगदान

स्वराज्याच्या जिवंत साक्षीदार किल्ल्यांची थोडक्यात ओळख…

रायगड – महाराजांची राजधानी, राज्याभिषेकाचे पवित्र स्थळ

राजगड – स्वराज्य स्थापनेची पहिली राजधानी

प्रतापगड – अफजलखान वधाचे रणांगण

पन्हाळा – पावनखिंडीतील बाजीप्रभूंचे शौर्य अमर केलेला किल्ला

शिवनेरी – शिवरायांचे जन्मस्थान

लोहगड – व्यापार मार्गांचे रक्षण करणारा किल्ला

साल्हेर – मराठ्यांनी मोगल सैन्याचा पराभव केलेले ऐतिहासिक युद्धस्थळ

सिंधुदुर्ग – समुद्रावर उभारलेला अजेय जलदुर्ग

विजयदुर्ग – मराठा नौदल सामर्थ्याचा केंद्रबिंदू

सुवर्णदुर्ग – हर्णे बंदराच्या सुरक्षेचा साक्षीदार

खांदेरी – मुंबई बंदरावर नजर ठेवणारा सागरी किल्ला

जिंजी (तामिळनाडू) – दक्षिणेचा जिब्राल्टर, राजाराम महाराजांची आसरा भूमी

जागतिक वारसा ठरल्याने होणारे फायदे…

—जागतिक स्तरावर संरक्षणासाठी निधी व तांत्रिक मदत मिळणार

—सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्वाला अधोरेखित मान्यता

—पर्यटनाला चालना मिळणार

—युवा पिढीपर्यंत स्वराज्याची खरी जाणीव पोहोचणार

शिवभक्तांसाठी अभिमानाचा क्षण…

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे फक्त दगडमातीचे बांधकाम नाहीत, ते मराठी अस्मितेचे जिवंत प्रतीक आहेत. आता ही अस्मिता जगभरात पोहोचली आहे.“शिवकाल फक्त आठवणीत नाही,त

 “शिवकाल फक्त आठवणीत नाही, तर अनुभवात यायला हवा… आणि आता तो अनुभवण्यासाठी जग महाराष्ट्रात येईल!” अनुभवण्यासाठी“शि                  “शिवकाल फक्त आठवणीत नाही, तर   Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??