जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

मुख्य सचिवपदी राजेश अगरवाल ; राजेश कुमार मीना निवृत्त, प्रशासनात नवी समीकरणे…

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार मीना हे 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असल्याने, त्यांच्या जागी 1989 बॅचचे ज्येष्ठ आयएएस अधिकारी राजेश अगरवाल यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1 डिसेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारतील.

सुजाता सौनिक यांच्या निवृत्तीनंतर सर्वात ज्येष्ठ असल्याने मीना यांची जून 2025 मध्ये मुख्य सचिव म्हणून निवड झाली होती. केवळ दोन महिन्यांचा कार्यकाळ असूनही त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आता त्यांच्या निवृत्तीनंतर राज्य प्रशासनाची सूत्रे अगरवाल यांच्या हाती जाणार आहेत.

आयआयटी दिल्लीमधून संगणक शाखेचे शिक्षण घेतलेल्या अगरवाल यांनी अकोला आणि जळगाव जिल्हाधिकारी, मुंबई महापालिकेत उपायुक्त, राज्यातील वित्त व आयटी विभागात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. केंद्र पातळीवर डिजीलॉकर, आधार, जनधन आणि सामाजिक न्यायाशी संबंधित प्रकल्पांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

अगरवाल यांचा 15 महिन्यांचा कार्यकाळ निश्चित होताच, मुख्य सचिवपदासाठी चर्चेत असलेले गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, तसेच ओ. पी. गुप्ता आणि दीपक कपूर यांना पुन्हा एकदा संधी न मिळाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

राज्य प्रशासनात नेतृत्वबदल झाल्याने मंत्रिमंडळ आणि मंत्रालयीन कामकाजात नवीन समीकरणे व गती निर्माण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??