सामाजिक

कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून टँकरलॉबीचे खिसे भरण्याचे उद्योग सुरु ; महापालिकेचे तोंडावर बोट..

पुणे : टँकर लॉबीकडून रोज हजार टँकर पाणी पुरवठा केला जात आहे. या टँकरचे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, ते पाणी कुठून भरतात, त्यांच्या पाण्याचा स्रोत काय याची कोणतीही माहिती महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही.

त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासोबत महापालिकात खेळ होत आहेच, पण महापालिकेच्या वॉल्व्हमॅनला हाताशी धरून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून टँकरलॉबीचे खिसे भरण्याचे उद्योग सुरु आहेत. यामुळेच नागरिक हवालदिल झाले आहेत.

पुणे शहर, उपनगरांमध्ये पाणी टंचाईच्या समस्या असल्याने नागरिक हैराण आहेत. खडकवासला धरणातून दरवर्षी २२ टीएमसी पाणी पुण्यासाठी वापरले जात आहे. तरीही अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. जुन्या हद्दीत हे प्रश्‍न आहेतच, पण शहरात समाविष्ट झालेल्या ३२ गावांच्या नव्या हद्दीत पाणी पुरवठ्याची यंत्रणाच नसल्याने हा बहुतांश भाग टँकरवर अवलंबून आहे.

या गावांमध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) बांधकामांना परवानगी दिली जाते. पाणी पुरवठ्याबाबत महापालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आणल्याशिवाय बांधकाम परवानगी दिली जाणार नाही असा निर्णय जुलै घेतला होता. पण समाविष्ट गावात पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे असे सांगत एका महिन्यात पीएमआरडीएने घुमजाव करत हा आदेश मागे घेतला.

त्यामुळे पाणी नसतानाही सदनिका विकल्या जात आहेत, बिल्डरकडून नागरिकांना टँकर पुरविण्याचे आश्‍वासन दिले जाते, पण एकदा बांधकाम संपले की रहिवाशांना तुमच्या पाण्याची व्यवस्था तुम्ही करा असे सांगून त्यांना वाऱ्यावर सोडले जाते. त्यामुळे या गावांमध्ये सोसायट्यांना पाण्यासाठी टँकरवर महिन्याला लाखो रुपयांचा खर्च करावा लागत आहे.

शहराच्या जुन्या हद्दीतही खासगी टँकर चालकांचा व्यवसाय प्रचंड तेजीत आहे. जास्त पैसे देऊनही टँकरसाठी काही तास वाट पाहावी लागते अशी स्थिती आहे. पण हे खासगी टँकरवाले कुठून पाणी भरतात. महापालिकेच्या टँकर भरणा केंद्राऐवजी शहरात खासगी टँकर भरणा केंद्र किती आहेत?, कोणत्या भागात आहेत? त्यात बोअर किती, विहिरी किती याची कोणतीही माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे नाही.

                      कृत्रिम पाणी टंचाई

शहराच्या जुन्या हद्दीत पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकानुसार पाणी सोडण्यासाठी, वॉल्व्ह फिरविण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत. पाणी पुरवठा पूर्ण दाबाने करायचा की दबाने हे ठरवतात, त्यानुसार वेळ कमी जास्त करतात. अनेक नागरिकांना पाणी कमी का आले, पाणी लवकर का गेले हे कळत नाही. त्यामुळे सोसायट्यांना नाइलाजास्तव टँकर मागवावे लागत आहेत.

खासगी टँकरचालक आणि वॉल्व्ह फिरविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मितलीभग असल्याने टँकर लॉबी मुजोर झाली आहे. पाणी कमी सोडले जात असल्याची तक्रार केल्यानंतर काही दिवस व्यवस्थित पाणी दिले जाते. त्यानंतर पुन्हा कमी पाणी सोडण्यात येते. या कृत्रिम पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण आहेत. तर ज्या सोसायट्या, नागरिक वॉल्व्ह मॅनला पैसे देतात त्यांना व्यवस्थित पाणी दिले जाते, यास पाणी पुरवठ्यातील काही अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

            टाक्या दिसतात पण पाणी नाही

पुणे महापालिकेने समान पाणी पुरवठा योजनेतून ८२ पैकी ५१ टाक्यांचे बांधकाम पूर्ण करून रंगरंगोटी केलेली आहे. तर १९ टाक्यांची कामे सुरु आहेत. ज्या भागात या टाक्या बांधल्या आहेत, तेथे बांधकाम व्यावसायिकांकडून या भागात या टाक्यांमधून २४ तास पाणी पुरवठा होणार आहे असे सांगितले जाते.

त्यामुळे त्यावर नागरिक विश्‍वास ठेवून घर विकत घेतात. पण या टाक्या बांधलेल्या असल्या तरी त्यांना जलवाहिनी जोडण्याचे काम दोन वर्षापासून अर्धवट ठेवण्यात आले आहे. हे काम पूर्ण केले जात नसल्याने त्यातून पाणी पुरवठा होत नाही. उलट नागरिकांना टँकरसाठी महिन्याला लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??