जिल्हासामाजिक

चार वर्षांचा संघर्ष अखेर यशस्वी, वेताळ बाबा वसाहतीत व पांढरे मळा परिसरात लवकरच पाण्याचा नवा प्रवाह, स्मिता गायकवाड यांच्या प्रयत्नांना मिळाले यश…

संपादक सुनिल थोरात.

पुणे (हडपसर) : “राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नव्हे, तर सामान्य जनतेच्या हक्कांसाठी मैदानात उतरलेली झुंज असते.” याच विचारांची प्रचिती दिली सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या स्मिता तुषार गायकवाड यांनी. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश मिळालं आहे.

वेताळ बाबा वसाहतीत वर्षानुवर्षे सुरू असलेल्या पाण्याच्या टंचाईच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्यात आला आहे. स्मिता गायकवाड यांनी सतत पाठपुरावा करून, लोकांचे आवाज अधिकाऱ्यांपर्यंत पोचवत ठेवल्यामुळेच हे शक्य झाले.

चार वर्षांपूर्वी अर्धवट राहिलेल्या पाईपलाईनच्या कामाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असताना, स्मिता गायकवाड यांनी पाणीपुरवठा विभाग तसेच लष्कर पाणी विभागाशी सातत्याने संवाद साधत हा विषय कायम चर्चेत ठेवला. कार्यकारी अभियंता राजेश शिंदे व मोराळे यांच्या माध्यमातून अखेर हे काम मार्गी लागले.

बजेटची तरतूद त्वरित करण्यात येणार असून, टेंडर प्रक्रियापण त्वरित सुरू करण्यात येणार आहे. लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार असून साधारण ६ महिन्यांत पाण्याची नवी लाईन पूर्ण होईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे.

यावेळी पांढरे मळा परिसरातील जलवाहिनीचे कामही हाती घेण्यात आले आहे. तेथे सध्या असलेली ४” लाईन ६” करण्यात येणार आहे. यासाठीही ६ महिन्यांचा कालावधी लागेल, आणि तोपर्यंत नागरिकांसाठी तात्पुरता पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील.

या निर्णयावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विमल वागलगावे, ज्योती पोल, ललित खरात, प्रभावती भूमकर, फरीदा भोरी आदींनी या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला.

स्मिता गायकवाड पुढे म्हणाल्या,‌ “ही केवळ विकासाची कामे नाहीत, तर ही माणसाच्या जगण्याच्या मूलभूत गरजांची लढाई आहे. लोकप्रतिनिधी म्हणून ही माझी जबाबदारी होती की या लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळावा. हा लढा माझा एकट्याचा नव्हता, तो तुमचा, आपला सगळ्यांचा होता!” हा विजय संवेदनशील, बांधिलकीची जाणीव असलेल्या राजकारणाचा आहे. तो जनतेच्या विश्वासाचा आणि संघर्षाच्या ठाम निर्धाराचा असल्याचे सांगितले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??