जिल्हासामाजिक

मुंढवा महार वतन जमीन घोटाळा : आंदोलनाचा सहावा दिवस; मूळ वतनदारांचा ठिय्या कायम, दोषींवर ॲट्रॉसिटीसह गुन्हे दाखल करण्याची ठाम मागणी…

मुंढवा (पुणे) – मुंढवा येथील बहुचर्चित महार वतन जमीन गैरव्यवहार प्रकरणावर न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी मूळ वतनदारांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन आज सहाव्या दिवशीही तीव्रतेने सुरू राहिले. २६ नोव्हेंबर २०२५ पासून दररोज सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू असून शासनाने मागण्या मान्य करेपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, असा इशारा वतनदारांनी दिला आहे.

या प्रकरणात जमीन मूळ वतनदारांच्या नावे करण्याचा निर्णय तातडीने घेण्यात यावा, तसेच जमीन व्यवहारात कथित भ्रष्टाचार, नियमभंग व बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या संबंधित व्यक्ती व अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी केली जात आहे. याबाबत माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सर्व संबंधित अधिकारी वर्गाची तातडीची बैठक आयोजित करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी पुन्हा एकदा जोरदार केली.

आंदोलनामध्ये आजही मूळ वतनदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. प्रकाश ढाले, सतीश गायकवाड, रोहन जाधव, महेंद्र लोंढे, अमोल गायकवाड, नितीन गायकवाड, सुभाष गायकवाड, संतोष गायकवाड, ऋषिकेश हरिभक्त, महेंद्र चव्हाण, निलेश गायकवाड यांसह अनेक वतनदार उपस्थित राहिले. सर्वांनी एकमुखाने आपल्या हक्कासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

उर्वरित सर्व वतनदारांनीही या आंदोलनात सहभागी होऊन एकजूट दाखवावी, असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे. “जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा ठाम पवित्रा सर्व वतनदारांनी घेतला आहे. मुंढवा येथील हा संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून शासनाने त्वरित कारवाई करण्याची मागणी अधिक जोमाने पुढे येत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??