महाराष्ट्रशिक्षणसामाजिक

विश्वशांती दर्शन वाहिनीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विचारमंथन, जागतिक शांततेसाठी मानवता सर्वात महत्वाची ; सुनील शास्त्री

पुणे : “मानवतेचा प्रचार करायचा असेल तर मानवता अंगीकारणे सर्वात महत्वाचे आहे. जर मानवता नसेल तर जागतिक शांती कशी येईल? आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती शांती विसरला आहे. त्यामुळे जयपूरमध्ये भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या नावाने विश्वधर्म संग्रहालय उभारून जागतिक शांतीचा नारा दिला जाईल,” असे विचार माजी राज्यसभा सदस्य आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांचे सुपुत्र सुनील शास्त्री यांनी व्यक्त केले.

ते माइर्स एमआयटी सुरू केलेल्या विश्वशांती दर्शन वाहिनीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमातील मान्यवरांची उपस्थिती…

या कार्यक्रमास अ‍ॅड गुरू भारत दाभोळकर व श्रीमती शास्त्री सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माइर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच वाहिनीचे सीईओ डॉ. मुकेश शर्मा आणि प्रसिद्ध कवी डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते.

सुनील शास्त्रींच्या आठवणी व विचार…

“जय जवान, जय किसान हा नारा देऊन देश एकत्र आणणारे लाल बहादूर शास्त्री नेहमीच देशाच्या कल्याणाचा विचार करत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉ. कराड यांनी जागतिक शांती हेच जीवनध्येय मानले आहे आणि विश्वशांती दर्शन वाहिनीद्वारे शांतीचा संदेश पसरवून सर्वांच्या मनात शांतीची बीजे पेरली आहेत,” असे सुनील शास्त्री म्हणाले.

बालपणीची आठवण सांगताना ते म्हणाले, “एकदा माझे वडील २१ दिवस मला भेटले नाहीत. मी रागावून विचारले तेव्हा त्यांनी सांगितले – भारत देश हेच माझे संपूर्ण कुटुंब आहे, त्यांची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे. हाच विचार आज डॉ. कराड यांच्या कार्यातून दिसून येतो.”

‘वसुधैव कुटुंबकम’चा पाया…

स्वागतपर भाषणात डॉ. मुकेश शर्मा म्हणाले, “ही वाहिनी वसुधैव कुटुंबकम या तत्त्वावर उभी आहे. जगभरातील प्रत्येकाला शांती कशी मिळेल, यावर सतत प्रसारण केले जाते.”

त्यानंतर भारत दाभोळकर यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपले विचार मांडले. यावेळी डॉ. कराड यांच्या जीवनकार्यावर आधारित लघुपट सादर करण्यात आला. विद्यार्थीनी संज्ञा उपाध्ये हिने सूत्रसंचालन केले तर डॉ. संजय उपाध्ये यांनी आभार मानले.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??