देश विदेशमहाराष्ट्रसामाजिक

भारताने पाकड्यांना ठेचले! आशिया चषक २०२५ वर तिरंगा, तिलक-शिवमची जोडी ठरली विजयानायक

भारताने पाकड्यांना ठेचले! आशिया चषक २०२५ वर तिरंगा फडकला...

दुबई : भारतीय संघाने पाकिस्तानवर पुन्हा एकदा मात करत आशिया चषक २०२५ चे जेतेपद पटकावले. केवळ २१ दिवसांत तिसऱ्यांदा पाकिस्तानी संघाचा पराभव करून भारताने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या थरारक अंतिम सामन्यात तिलक वर्मा (नाबाद ६९) आणि शिवम दुबे (३३) यांच्या जोडीने निर्णायक क्षणी खेळ उंचावला.

पहिल्यांदाच आशिया चषकाच्या ४१ वर्षांच्या इतिहासात भारत-पाक सामना फायनलमध्ये झाला आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वर्चस्व गाजवले.

पाकिस्तानचा डाव – चक्रवर्ती व कुलदीपसमोर गडगडाट…

साहिबजादा फरहान (५८) व फखर जमान (४६) यांनी दमदार सुरुवात करून १८० धावांचा अंदाज दिला होता. पण, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीसमोर पाकड्यांची भंबेरी उडाली. पाकिस्तानचा डाव ११३/२ वरून १४६ धावांवर संपला. कुलदीप यादवने ४/३० अशी स्वप्नवत कामगिरी केली. जसप्रीत बुमराहअक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

भारताची डगमगती सुरुवात…

भारताची सुरुवात मात्र निराशाजनक ठरली. आघाडीचे तीन फलंदाज – अभिषेक शर्मा (५), सूर्यकुमार यादव (८) आणि शुभमन गिल (१२) स्वस्तात बाद झाले. या वेळी संजू सॅमसन आणि तिलक वर्माने डाव सावरत ५७ धावांची भागीदारी केली. संजू २४ धावांवर बाद झाला.

तिलक-शिवमची जोडी ठरली गेमचेंजर…

४२ चेंडूंवर ६९ धावांची गरज असताना शिवम दुबे मैदानात आला आणि तिलकसोबत त्याने सामना भारताच्या बाजूला खेचला. दोघांनी ६० धावांची भागीदारी करत पाकिस्तानला बचावाच्या भूमिकेत ढकलले. अखेर सहा चेंडूंवर १० धावांची गरज असताना तिलकने षटकार ठोकून भारताला आशिया चषक जिंकून दिला.

तिलक वर्मा नाबाद ६९ (५३ चेंडू, ३ चौकार, ४ षटकार) ठरला सामनावीर. रिंकू सिंगने विजयी धाव घेत भारतीय विजयावर शिक्कामोर्तब केले.

अपराजित भारत – सलग सात सामने जिंकले…

या विजयानंतर भारताने स्पर्धेत सलग सात विजय मिळवत अपराजितपणा टिकवला. आशिया चषकाच्या इतिहासात भारताचे हे आणखी एक ऐतिहासिक यश ठरले.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??