महाराष्ट्रसामाजिक

अक्कलकोटातून स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची 29 वी “पालखी परिक्रमा” उत्साहात प्रस्थान 243 दिवसांची राज्यव्यापी धर्मयात्रा सुरू…

अक्कलकोट : अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री अन्नपूर्णामाता की जय या जयघोषात स्वामीभक्तांच्या श्रद्धेची परंपरा उजळवत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची भव्य “पालखी परिक्रमा” रविवारी तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून निघाली.

न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिव्य सोहळा संपन्न झाला.

गेल्या 28 वर्षांपासून सातत्याने काढल्या जाणाऱ्या या धार्मिक यात्रेचे हे 29वे वर्ष असून, परिक्रमेचा शुभारंभ श्री स्वामी समर्थ पादुका पूजनाने झाला. महाप्रसादालयात झालेल्या त्या मंगलपूजनात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, देवस्थानचे मुख्य पुरोहित प.पू. मोहनराव गोविंदराव पुजारी यांचे चिरंजीव मंदार पुजारी, तसेच श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे प.पू. अण्णू महाराज पुजारी प्रमुख उपस्थित होते.

पूजनानंतर न्यासाच्या परिसरातील श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर, श्री भवानी माता मंदिर, समाधी मठ, तसेच श्री मल्लिकार्जुन आणि खंडोबा मंदिरात आरत्या झाल्यानंतर पालखीचा शुभप्रस्थान सोलापूरकडे निघाला. भक्ती, ढोल-ताशे, टाळ-मृदंग, भावगीते आणि निःस्वार्थ सेवाभाव या वातावरणात परिक्रमा थाटात मार्गस्थ झाली.

ही परिक्रमा २४३ दिवस महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील प्रमुख दैवस्थानांमधून प्रवास करून, दिनांक 15 जुलै 2026 रोजी पुन्हा अक्कलकोट नगरीत परतणार आहे. भक्तांच्या ओढीने आणि संतपरंपरेच्या प्रकाशाने नटलेली ही राज्यव्यापी धर्मयात्रा यंदाही भव्यतेने पार पडणार आहे, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??