जिल्हासामाजिक

मांजराईनगर झोपडपट्टीमध्ये पिण्याचे व वापरण्याचे पाणी बंद, ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी हाल ; राजेंद्र साळवे मांजरी बुद्रुक…

पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करणार.. राजेंद्र साळवे मांजरी बुद्रुक..

पुणे (हवेली) : मांजरी बुद्रुक मधील मांजराईनगर परिसरातील माळवाडी, कुंजीर वस्ती, वेताळ वस्ती, राजीव गांधी नगर, सटवाई नगर, ११६ घरकुल, ७२ घरकुल, आधी झोपडपट्टी भागासह गावठाण मध्ये ग्रामपंचायत काळातील बोरवेलचे मुबलक वापरण्यासाठी पाणी मिळायचे.. आता तशी परिस्थिती राहिली नाही.

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र साळवे यांनी ‘द पाॅईट न्युजशी बोलतांना सांगितले. की मांजरी बुद्रुक गाव पुणे मनपात समाविष्ट झाल्यानंतर येथील नागरिकांनी, या परिसरात ५० दिवस बेमुदत धरणे आंदोलन करून पिण्याचे टँकरद्वारे पाणी चालू केले होते. त्यामुळे नागरिकांना दररोज टँकर येत असल्यामुळे दोन वर्ष दिलासा मिळाला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची या भागामध्ये पाच दशलक्ष क्षमतेची टाकी बांधलेली आहे. त्यावेळी लोकसंख्या मर्यादित होती. आता या जीवन प्राधिकरणाने टाकलेल्या पिण्याच्या पाण्यासाठी मुख्य जलवाहिन्यांना भोके पाडून घरोघरी न कनेक्शन दिले आहे. रस्त्यावरच अर्धवट खोदाई करून रस्ते खराब केले आहे. व नळ कनेक्शन घेताना प्लॅस्टिकची पाईपलाईन उघड्यावर ठेवल्यामुळे ती तुटण्याचा व त्यामुळे भांडणे व मारामारी होण्याचा धोका निर्माण झाले आहे. त्यामुळे वापरण्याचे पाणी या परिसरात बंद झालेले आहे.

                    बेकादेशीर पाईपलाईन द्वारे पाणी पुरवले जाते..

राजेंद्र साळवे म्हणाले जीवन प्राधिकरणाचे बेकायदेशीर नळाद्वारे मिळणारे प्राणी सुद्धा चार ते पाच दिवसांनी येत आहे.. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी खूपच हाल होत आहेत. याचे मुख्य कारण नवीन वाढलेल्या केशवनगर हद्दीपर्यंत दहा ते पंधरा हजार वसाहतींना सदरचे पाणी बेकादेशीर पाईपलाईन द्वारे पुरवले आहे. मांजरी बुद्रुक हे नदीच्या काठी गाव असताना पाणी मिळत नाही याची खुप मोठी खंत आहे. नक्की प्रशासनाला पाणी द्यायचे आहे का नाही..

                जनता तहानलेली, पुढारी मनपाच्या पाणी योजनेचे मालक म्हणे..

खरंतर वार्ड क्रमांक ३ मध्ये सैनिक नगर साठ फुटी रोड येथे या भागातील लोकांसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची टाकी पुणे मनपा ने त्वरित बांधणे आवश्यक आहे. परंतु पुढाऱ्यांनी पुणे मनपाच्या पाणी योजनेचे मालक म्हणून फ्लेक्सबाजी करून मांजराईनगर परिसरातील झोपडपट्टी भागांमध्ये पाण्याची नियोजन विस्कळीत करून टाकले आहे. व पुणे महापालिका सदरची वस्तुस्थिती माहीत असताना त्याकडे दुर्लक्ष करत आहे.. त्यामुळे या भागातील गरीब नागरिक पाण्यासाठी दुहेरी कात्रीत सापडले आहे. प्रशासनाला जाग कधी येणार?

                 राजेंद्र साळवे. सामाजिक कार्यकर्ते.

झोपडपट्टी भागातील शासनाने बांधलेल्या ७२ घरकुल व ११६ घरकुल झोपडपट्टीमध्ये पुणे मनपा ने चार इंच बिडाची पाईपाची अंतर्गत लाईन त्वरित टाकावी व घरगुती नळ कनेक्शन देणे.. तोपर्यंत बंद केलेले वापरण्याचे पाणी त्वरित चालू करावे.. व दररोज टँकरने या भागात पाणीपुरवठा करावा.. या मुख्य मागणीसाठी दिनांक २७/०२/२०२५ रोजी गुरुवारी सायंकाळी ४:०० वाजता पुणे महानगरपालिका समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे राजेंद्र साळवे यांनी सांगितले.

आंदोलनात मांजरी बुद्रुक परिसरातील २०० पुरुष व २०० महिला सहभागी होणार आहेत. लेखी पत्र मिळेपर्यंत सदरचे आंदोलन मागे घेणार नाही.. तरी याची दखल घ्यावी अशी विनंती. राजेंद्र गोविंद साळवे. निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नंदकिशोर जगताप पाणीपुरवठा प्रमुख पुणे महानगरपालिका यांना निवेदन देताना यावेळी राजेंद्र साळवे. सुनिता ढेकणे, श्रीमती सारिका प्रतापे, श्रीमती कल्याणी जगताप, पारूबाई भंडारी, मुद्रिका छगन भोसले, संगीता लोखंडे, सावित्रा सावंत, अनिता कुंभार व इतर नागरिक उपस्थित होते.

          नंदकिशोर जगताप पाणी पुरवठा प्रमुख पुणे महानगरपालिका

नंदकिशोर जगताप पाणी पुरवठा विभाग महानगरपालिका पुणे यांच्याशी या संदर्भात माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

निवेदनाची प्रत माहितीसाठी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे, पोलीस आयुक्त विशेष शाखा पुणे शहर पोलीस पुणे व पाणीपुरवठा प्रमुख पुणे मनपा यांना दिली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??