जिल्हासामाजिक

आष्टापुरात ११ दिवसांत दुसरा बिबट्या जेरबंद ; नागरिकांना दिलासा, मात्र भीती कायम…

तुळशीराम घुसाळकर

हवेली, पुणे : हवेली तालुक्यातील आष्टापूर ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी व कलदरा खोलशेत परिसरात गेल्या अकरा दिवसांत दोन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला असला, तरी परिसरात अजूनही बिबट्यांचा वावर असल्याच्या शक्यतेमुळे भीतीचे वातावरण कायम आहे.

आष्टापूर ग्रामस्थांच्या मागणीनुसार वनविभागाने चार ते पाच पिंजरे लावले होते. त्यापैकी मंगळवार (दि. ३० डिसेंबर) रोजी पहिला बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर रविवार (दि. ११ जानेवारी) रोजी पहाटे आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. या दुसऱ्या बिबट्याने रात्रीच्या वेळी मेंढपाळांच्या वस्तींवर हल्ले करून एका दिवशी एक मेंढी तर दुसऱ्या दिवशी तीन मेंढ्या ठार केल्या होत्या. या घटनांमुळे शेतकरी व मेंढपाळांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री शेतात पाणी देण्यासाठी जाण्यास कचरू लागले होते, तसेच उसतोडणी कामगारही ऊस तोडण्यास तयार नव्हते. दुसरा बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळाला असला, तरी आष्टापूर पठारवाडी परिसरातील उसाच्या शेतात यापूर्वी बिबट्याची तीन पिल्ले आढळून आल्याने अजूनही बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

परिसरातील नागरिकांनी विविध ठिकाणी अधिक पिंजरे लावून उर्वरित बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल, माजी संचालक श्रीहरी कोतवाल, आष्टापूरच्या सरपंच पुष्पा कोतवाल, माजी सरपंच कविता जगताप, उपसरपंच संजय कोतवाल, माजी उपसरपंच सोमनाथ कोतवाल, शैला कोतवाल, रमेश कोतवाल, दत्तात्रेय कटके, कालिदास कोतवाल, उद्योजक राजेश कोतवाल, पोपट कोतवाल आदींनी वनविभागाकडे ही मागणी केली आहे.

गेल्या ११ दिवसांत दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळाल्याने वनविभागाच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात मेंढपाळांचे झालेले नुकसान यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केले आहेत. संबंधित शेतकरी व मेंढपाळांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी अनिकेत दादासो कोतवाल, हिरामण कोतवाल, दत्ता कोतवाल, सुभाष शांताराम कोतवाल यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??