जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

यवत पोलिसात खळबळ! वरिष्ठांच्या छळाला कंटाळून पोलिस कर्मचाऱ्याची काळीज चिरणारी पोस्ट ; मुलीच्या वाढदिवशी वडिलांची हताश हाक…

यवत (ता. दौंड) : यवत पोलीस ठाण्यातील अंतर्गत कारभार, वरिष्ठांची मनमानी आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवरील अन्याय या सर्वांचा एकाचवेळी भांडाफोड करणारी धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांनी त्यांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवशी उपस्थित राहता येत नसल्याचे दुःख व्यक्त करत सोशल मीडियावर टाकलेली काळीज चिरणारी पोस्ट अचानक व्हायरल झाली आणि परिसरात खळबळ उडाली. या पोस्टमध्ये त्यांनी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख गेल्या वर्षभरापासून सातत्याने मानसिक छळ करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोस्ट पाहिल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी थरथर कापणारी परिस्थिती अनुभवली असून सहकाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रणदिवे यांनी लिहिलेली पोस्ट अत्यंत वेदनादायी असून त्यातून पोलिस कर्मचारी झालेल्या मानसिक त्रासाचे जिवंत चित्र उमटते. त्यांनी म्हटले आहे, “दिदी, आज तुझा पहिला वाढदिवस… मला तुझ्यासोबत साजरा करायचा होता. पण मी पोलीस आहे, येथे वरिष्ठांची मनमानी चालते. तू आजारी असताना मला जबरदस्ती नाशिक, जळगाव, अहमदनगर येथे पाठवले गेले, तुला हॉस्पिटलला घेऊन जाण्यासही मिळाले नाही. यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी नारायण देशमुख मला वर्षभर त्रास देत आहेत. माझा नाविलाज झाला आहे. मी माझ्या जीवाचे बरेवाईट करत आहे. ही तुझ्यासाठी पहिली आणि शेवटची शुभेच्छा.”

या पोस्टमधील “पहिली आणि शेवटची शुभेच्छा” या शब्दांनी रणदिवे यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्याने ते कुठे आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे त्यांच्या जीविताबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सहकारी पोलिस, मित्र आणि नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर यवत परिसरात संताप आणि चिंता यांचे वातावरण आहे.

दरम्यान वरिष्ठ निरीक्षक नारायण देशमुख यांना या प्रकरणाबाबत विचारले असता त्यांनी संपूर्ण आरोप नाकारत, “पोस्टमधील सर्व आरोप निराधार आहेत. रणदिवे यांचा शोध घेण्यासाठी पथक पाठवले आहे,” असे उत्तर दिले. मात्र नागरिक आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांना देशमुख यांचे उत्तर समाधानकारक वाटले नाही.

यवत पोलीस ठाण्यातील काही मागासवर्गीय पोलिसांवर वरिष्ठांकडून मनमानी आदेश, अन्याय, बदनामी, अकारण बदल्या आणि मानसिक छळ होत असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरु आहे. काही अधिकारी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार दखल घेण्याच्या प्रकरणांत विलंब करतात, तर फिर्यादींना अनावश्यक त्रास दिल्याचेही आरोप आहेत. आरोपींना आर्थिक तडजोड करून वाचवले जाते, तर कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते, असे बोलले जाते.

अलीकडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा मोडतोड प्रकरणात एका मागासवर्गीय पोलिसाने स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोपीला पकडले होते. मात्र त्याचा सन्मान करण्याऐवजी त्यालाच दुजाभाव आणि अपमानास्पद वागणूक दिल्याची चर्चा पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर आहे. ही घटना आणि रणदिवे यांची पोस्ट या दोन्ही समोर आल्यानंतर यवत ठाण्यातील अंतर्गत स्थिती किती बिघडलेली आहे याची स्पष्ट झलक मिळते.

यवत परिसरातील नागरिकांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी, वरिष्ठांच्या कार्यपद्धतीचे परीक्षण, संपत्ती व आर्थिक व्यवहारांची तपासणी आणि तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “देशमुखशाही आता थांबलीच पाहिजे,” असा आवाज नागरिकांमधून उघडपणे उठू लागला आहे.

निखिल रणदिवे यांचा शोध लागेपर्यंत आणि त्यांची प्रकृती व सुरक्षितता स्पष्ट होईपर्यंत संपूर्ण परिसरात भीतीचे सावट कायम आहे. मुलीच्या पहिल्या वाढदिवशी वडिलांनी लिहिलेली “शेवटची शुभेच्छा” ही ओळ केवळ भावनिक नाही; तर पोलीस दलातील जुलूम, अन्याय, मानसिक छळ आणि व्यवस्थेतील गंजलेले अंधारलेले चेहरे यांचा निर्दय पर्दाफाश करणारी आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??