शिक्षण

आरटीई’ प्रवेशासाठी ८ हजार ३१६ शाळांची नोंदणी..

शाळांच्यी नोंदणीसाठी आरटीई पोर्टलवर सुविधा उपलब्ध..

पुणे : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी ८ हजार ३१६ शाळांनी नोंदणी केली असून एकुण १ लाख १ हजार ४७४ प्रवेशाच्या जागांची नोंदणी झालेली आहे.

आरटीई अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये काही प्रवेश राखीव ठेवलेले असतात. यात प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येते. यंदा प्रवेश प्रक्रिया लवकर म्हणजेच डिसेंबर मध्येच सुरु करण्यात आली आहे. १८ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत शाळांच्यी नोंदणीसाठी आरटीई पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.

या मुदतीत पुरेशा शाळांनी नोंदणी केलीच नव्हती. शाळा नोंदणी व शाळा व्हेरिफिकेशनचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही ही बाब प्रशासकीयदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे ४ जानेवारी पर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. ही अंतिम मुदतवाढ असून दिलेल्या मुदतीत अपूर्ण काम राहिल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षात राज्यातील एकूण ९ हजार १३८ इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी नोंदणी केली होती. त्यानुसार १ लाख २ हजार ४३४ जागा उपलब्ध झाल्या होत्या. य़ंदा अद्यापही काही शाळांनी नोंदणी केलेली नाही.

जिल्हानिहाय शाळा नोंदणी व कंसात प्रवेशाच्या जागा

अहिल्यानगर – ३४८(३२८७), अकोला – १८७ (१९८३), अमरावती – २१८ (२३८७), भंडारा – ८७ (८२७), बीड – १९९ (२०३७), बुलढाणा – २३० (२८१८), चंद्रपुर – १८३(१५१६), छत्रपती संभाजीनगर् – ५२६ (४०७६), धाराशीव – १०७ (११३७), धुळे – ९९ (११७७), गडचिरीली – ५६ (४७२), गोंदिया – १२३ (९७०), हिंगोली – ८७ (७९०), जळगाव् – २६८(३१६८), जालना – २९४ (२११८), कोल्हापुर – ३२८ (३२५३), लातुर – २०७ (२१७३), मुंबई – ३१४ (५८५७), नागपुर- ६३९ (६९६०), नांदेड- २३९ (२७२८), नंदुरबार – ४३ (३५९), नाशिक – ४०७ (५२९६), पालघ्रर – २७२(५१४२), परभणी – १५२(१३२५), पुणे – ७५८ (१४२७४), रायगड – १७० (३२९१), रत्नागिरी – ९० (७७२), सांगली – २१२(१९४४), सातारा – १७६(१४८९), सिंधुदुर्ग – ४५(२६७), सोलापुर – २७८(२५५१), ठाणे – ६०६ (१११४१), वर्धा – ११२(१२६६), वाशिम – ५९ (६५२), यवतमाळ – १९७ (१९७१).

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??