जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

मुंबईत दहीहंडीच्या उत्साहात दोन गोविंदांचा मृत्यू, ७५ जखमी; जोगेश्वरी व घाटकोपरमध्ये दहा थरांचा विक्रम…

मुंबई : ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि पावसाच्या सरींमध्ये मुंबई आणि ठाण्यात यंदाची दहीहंडी रंगली. उत्साह आणि रोमांच यांचा शिखर गाठत गोविंदांनी नऊ थरांचा जुना विक्रम मोडून दहा थरांचा नवा विश्वविक्रम रचला. मात्र, या जल्लोषात दुर्दैवाने दोन गोविंदांचा मृत्यू झाला, तर ७५ जण जखमी झाले.

अपघातात दोनांचा मृत्यू…

मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द येथे हंडीचा दोर बांधताना तोल जाऊन ३२ वर्षीय जगमोहन शिवकिरण चौधरी यांचा मृत्यू झाला. तर गावदेवी गोविंदा पथकातील रोहन वाळवी यांचा देखील मृत्यू झाला. या दोन्ही अपघातांमुळे आनंदोत्सवावर शोककळा पसरली.

जखमींची आकडेवारी…

दिवसभरातील विविध अपघातांत ७५ गोविंद जखमी झाले. त्यांना केईएम, नायर, सायन, शताब्दी आणि जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून, ३२ जणांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर ४३ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

दहा थरांचा विक्रम…

जोगेश्वरीतील कोकणनगरचा राजा गोविंदा पथकाने प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या आयोजनात दहा थरांचा विक्रम रचून २५ लाखांचे बक्षीस पटकावले. याआधी नऊ थरांचा विक्रम नोंदवला गेला होता. घाटकोपर पश्चिमेच्या अमृतनगरमध्ये मनसेचे विभागाध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या पुढाकाराने आयोजित दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकानेही विक्रमी दहा थर रचून उपस्थितांची दाद मिळवली.

पावसातही न थांबलेले उत्सव…

मुंबई, ठाणे, वरळी, घाटकोपर, कांदिवली, मागाठाणे, मुलुंड, दादर, बोरिवली यांसह अनेक भागांत सकाळपासून गोविंद पथकांनी सहभाग नोंदवला. लाखो रुपयांची बक्षिसे, राजकीय नेत्यांचे भव्य आयोजन आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंड्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली होती. पावसाच्या सरींमध्येही गोविंदांचा उत्साह, जिद्द आणि टीमवर्क यामुळे यंदाचा दहीहंडी सोहळा विक्रमी व संस्मरणीय ठरला.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??