जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कोणतीही स्थगिती नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय…

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर स्थगिती येणार की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना सर्वोच्च न्यायालयाने आज (ता. २८) महत्त्वाचा निर्णय देत स्पष्ट केले की कोणत्या ही निवडणुकांना स्थगिती दिली जाणार नाही. आरक्षणाच्या मर्यादेबाबत राज्यात निर्माण झालेल्या संभ्रमावर न्यायालयाने स्पष्ट शिक्कामोर्तब केले.

ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण लागू केल्यानंतर राज्यातील ५७ ठिकाणी एकूण आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून वाढत असल्याचा मुद्दा न्यायालयात मांडण्यात आला होता. ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने दुपारच्या सुनावणीत ठाम भूमिका घेत सांगितले की, मनपा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका विलंबित होऊ देणार नाही.

न्यायालयाने पुढे स्पष्ट केले की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के मर्यादा ओलांडली आहे, त्या संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशाधीन राहतील. तरीदेखील निवडणुका थांबणार नसून प्रक्रिया सुरुच राहणार आहे.

या प्रकरणातील पुढील सुनावणी २१ जानेवारीला तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर घेतली जाणार आहे.

दरम्यान, ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात २७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस बांठिया आयोगाने केली होती. मात्र एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या पुढे जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही आयोगाने नमूद केले होते. या शिफारसींना वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी विरोध नोंदवला होता. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ४० नगरपरिषदा आणि १७ नगरपंचायतींमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण लागू झाल्याचे न्यायालयाला कळविण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर अधिकृतपणे मोकळा झालेला आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??