क्राईम न्युजमहाराष्ट्र

नव्या कायद्यातील २०२३ च्या कलम २८५ नुसार पहिला गुन्हा दाखल ; विटा

नवीन कायद्याची अंमल बजावणी इतर जिल्हात कधी होणार?

सांगली (विटा) : एका आईस्क्रीम विक्रेत्यावर विटा पोलिसांनी नव्या कायद्यातील भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८५ प्रमाणे पहिला गुन्हा दाखल केला आहे. कमलेश लालचंद जाट (वय ३४) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचा नाव त्याने येथील मायणी रस्त्यावर आईस्क्रीमचा हातगाडा लावला होता. याबाबत हवालदार विक्रमसिंह विजयकुमार गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

विट्यात वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत आहे. विटा ते मायणी, विटा ते कराड, विटा ते साळशिंगे रस्त्याकडेच्या खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांमुळे आणि त्या गाड्यांसमोर ग्राहकांनी लावलेल्या दुचाकींमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. ही गोष्ट लक्षात घेता नुकतीच पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी या हातगाडे विक्रेत्यांना नियम पाळा अन्यथा गुन्हे दाखल करू, अशी तंबी दिली होती.

या पार्श्वभूमीवर आता नव्या कायद्यातील भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८५ प्रमाणे पहिला गुन्हा दाखल केला आहे. कमलेश जाट याने त्याचा आईस्क्रीमचा हातगाडा लावून सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा केला. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता, सोयी, सभ्यता आणि नैतिकता प्रभावित करणाऱ्या गुन्ह्यांबद्दल भारतीय न्याय संहिता प्रकरण १५ अंतर्गत जो कोणी, कोणतेही कृत्य करून किंवा त्याच्या ताब्यातील अथवा त्याच्या ताब्यातील कोणत्याही मालमत्तेचा सुव्यवस्था न स्वीकारता, कोणत्याही सार्वजनिक मार्गावर किंवा सार्वजनिक जलमार्गावर कोणत्याही व्यक्तीला धोका, अडथळा किंवा दुखापत निर्माण करेल. म्हणून कमलेश जाट विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा कायदा निर्माण होण्यापूर्वी भारतीय दंड संहिता आय पी सी २८३ अंतर्गत असे गुन्हे दाखल व्हायचे. परंतु त्यामध्ये केवळ २०० ते ५०० रुपयांची दंडाची शिक्षा होती. या नवीन भारतीय न्याय संहिता २०२३ च्या २८५ कलमानुसार ५००० हजार रुपये पर्यंत दंडाची तरतूद आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??