कृषी व्यापारजिल्हामहाराष्ट्रसामाजिक

निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचा २५ वा ऊस गळीत हंगाम सुरू…

हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते बाॅयलर अग्निप्रदिपन...

संपादक डॉ. गजानन टिंगरे 

शहाजीनगर (ता. इंदापूर) : येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवारी (दि. २) उत्साहात करण्यात आला. कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामाचे औचित्य साधत बाॅयलर अग्निप्रदिपनाचा समारंभ कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.

या प्रसंगी सत्यनारायणाची महापूजा कारखान्याचे संचालक महेशकुमार शिर्केधनश्री शिर्के या उभयतांच्या हस्ते संपन्न झाली. धार्मिक वातावरणात झालेल्या या पूजेनंतर अग्निप्रदिपनाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, संचालक मंडळाचे लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे यांच्यासह कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारखान्याच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या प्रवासात शेतकऱ्यांचा सातत्याने असलेला विश्वास आणि सहकार यामुळे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याने उल्लेखनीय प्रगती साधली असल्याचे या वेळी सांगण्यात आले. यंदाचा गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??