ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जालना जिल्ह्याला नवी प्रशासकीय जबाबदारीची साथ! आशिमा मित्तल यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला…

जालना : श्रीमती आशिमा मित्तल यांनी जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा शुक्रवार, दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. त्या यापूर्वी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या आणि शिक्षण व प्रशासन क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

राजस्थानमधील जयपूर येथील रहिवासी असलेल्या आशिमा मित्तल या आयआयटी मुंबई येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. पदवी प्राप्त असून, त्यांना प्रतिष्ठित शंकर दयाल शर्मा सुवर्ण पदक देखील मिळाले आहे. त्यांनी मानववंशशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

सन 2017 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा (IAS) उत्तीर्ण करत त्यांनी देशात १२वा क्रमांक मिळवला होता. 2018 साली त्या महाराष्ट्र कॅडरमध्ये नियुक्त झाल्या. त्यांच्या प्रशासनिक प्रवासात त्यांनी डहाणू (पालघर) येथे आयटीडीपी प्रकल्प अधिकारी, तसेच अहिल्यानगर येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून कार्य केले आहे.

नाशिक जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक नवकल्पना राबवून सकारात्मक बदल घडवून आणले. आता जालना जिल्हाधिकारी म्हणून त्या प्रशासनाच्या विविध अंगांवर लक्ष केंद्रित करणार आहेत.

नवीन जिल्हाधिकारीच्या आगमनामुळे जालना जिल्ह्यातील प्रशासनाला नवी ऊर्जा आणि दृष्टीकोन मिळणार, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Editer Sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??