जिल्हासामाजिक

बिनविरोध निवडणुकीत अध्यक्ष हरिभाऊ कदम, उपाध्यक्षपदी स्वाती काळभोर यांची निवड ; अंबरनाथ पतसंस्थेत नव्या नेतृत्वाचा उदय!

अंबरनाथ सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हरिभाऊ कदम, उपाध्यक्षपदी स्वाती काळभोर यांची बिनविरोध निवड...

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हरिभाऊ मारुती कदम, तर उपाध्यक्षपदी स्वाती काळभोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. 23) पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत या दोघांची सर्वानुमते निवड झाली.

पतसंस्थेचे मावळते अध्यक्ष अशोक कदम व उपाध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी कार्यकाळ संपल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद रिक्त झाले होते. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेत अध्यक्षपदी हरिभाऊ कदम व उपाध्यक्षपदी स्वाती काळभोर यांची निवड करण्यात आली.

या वेळी हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुर्यकांत खैरे, संचालक अशोक कदम, प्रकाश कांबळे, आशा खैरे, तसेच व्यवस्थापक मारुती सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना सन 1992 मध्ये संस्थापक स्व. कल्याण (अण्णा) गुजर यांनी केली. या पतसंस्थेच्या स्थापनामध्ये स्व. ॲड. पी. पी. काळभोर यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. आज पतसंस्था नागरिकांना अल्पदरात कर्जपुरवठा करीत असून तिच्या कामकाजात सातत्याने पारदर्शकता ठेवली जाते. सध्या संस्थेमध्ये 2 कोटी 60 लाख रुपयांच्या ठेवी, तर 2 कोटी 13 लाख रुपयांचे कर्जवाटप झालेले आहे. संस्थेने 65 लाखांची गुंतवणूक केली असून वार्षिक उलाढाल तब्बल 7 कोटी 50 लाख रुपयांची आहे.

“आगामी काळात पतसंस्थेचा कारभार पारदर्शक पद्धतीने करणार असून सर्व संचालक व सभासदांना एकत्र घेऊन संस्थेच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे,” असे नवनिर्वाचित अध्यक्ष हरिभाऊ कदम यांनी सांगितले.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??