देश विदेशमहाराष्ट्रराजकीय

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्याचे प्रयत्न तीव्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दिलासा, “पर्यटकांनी घाबरु नये, सरकार पूर्णपणे सोबत आहे”

मुंबई : नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्यटकांची चिंता वाढली आहे. मात्र, राज्य सरकारने तत्काळ पावले उचलत अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे घरी परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, महाराष्ट्र सदन आणि काठमांडूमधील भारतीय दुतावास यांच्या सतत संपर्कात राहून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. “नेपाळमध्ये असलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुखरुप महाराष्ट्रात परत आणणे हीच आमची प्राथमिकता आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी काळजी करू नये,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः ठाणे जिल्ह्यातील मुरबाड परिसरातील पर्यटकांची संख्या अधिक आहे. याशिवाय बीड जिल्ह्यातील काही पर्यटक खासगी वाहनाने परत येण्यासाठी निघाले असून, ते उत्तर प्रदेशातील गोरखपूरपर्यंत पोहोचले आहेत.

राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की, सर्व पर्यटकांशी संपर्क साधण्यात आला असून ते सुरक्षित आहेत. त्यांना आवश्यक ती मदत पुरविण्यासाठी शासनाचे यंत्रणा सक्रिय आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “या गंभीर परिस्थितीत महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरून जाऊ नये. त्यांना सुखरुप घरी परत आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार समन्वयाने कार्यरत आहे.”

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??