जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

200 वर्षांत प्रथमच! महाराष्ट्राच्या 19 वर्षीय तरुणाने काशीमध्ये रचला इतिहास ; वेदमूर्ती देवव्रत महेश रेखेचं मोदींकडून कौतुक…

काशी | उत्तर प्रदेशातील काशीमध्ये वेद–संस्कृत अभ्यासासाठी देशभरातील विद्यार्थ्यांची परंपरा असताना, महाराष्ट्रातील अवघ्या 19 वर्षीय तरुणाने तब्बल 200 वर्षांनंतर अभूतपूर्व असा ऐतिहासिक पराक्रम साधला आहे. अहिल्यानगरच्या देवव्रत महेश रेखे या तरुणाने शुक्ल यजुर्वेद माध्यंदिनी शाखेचा एकाकी कंठस्थ दंडक्रम पारायण पूर्ण करून दुर्मीळ असा मान पटकावला आहे.

या अतिशय कठीण मानल्या जाणाऱ्या दंड कर्म पारायणात जवळपास 2000 मंत्रांचे सरळउलट क्रमातील पठण विशिष्ट पद्धतीने करावे लागते. देशातील मोजक्या वेदपंडितांनाच हा अभ्यास पूर्ण करता येतो. देवव्रतने 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सलग 50 दिवस, दररोज सकाळी 8 ते 12 या वेळेत काशीतील रामघाट येथील वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयात पारायण पूर्ण केले.

या उल्लेखनीय यशानंतर देवव्रत रेखेलावेदमूर्ती’ ही प्रतिष्ठित उपाधी प्रदान करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या अभूतपूर्व कामगिरीचं कौतुक करत देवव्रतच्या जिद्दीची व मेहनतीची प्रशंसा केली.

देवव्रत रेखेचा जन्म अहिल्यानगरमधील ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याचे वडील चंद्रकांत रेखे हे स्वतः विद्वान वेदपंडित असून देवव्रतचे पहिले गुरुही तेच आहेत. पाचव्या वर्षापासून देवव्रतने वेदपठणाचा अभ्यास सुरू केला आणि सततच्या साधनेतून अल्पवयातच वेदमूर्ती पदवीपर्यंतचा प्रवास गाठला.

गेल्या दोन शतकांत हा पराक्रम साधणारा देवव्रत हा दुसरा महाराष्ट्राचा विद्यार्थी ठरला आहे. यापूर्वी नाशिकचे वेदमूर्ती नारायण शास्त्री यांनी सुमारे 200 वर्षांपूर्वी ‘देवदंड कर्म पारायण’ पूर्ण केले होते.

महाराष्ट्रातील छोट्याशा गावातून काशीच्या विद्यापीठापर्यंतचा आणि थेट वेदमूर्ती उपाधीपर्यंतचा देवव्रत रेखेचा प्रवास आज संपूर्ण देशभरातून कौतुकास्पद ठरत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??