देश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“भगवा आतंकवादाचा शिक्का मारणाऱ्यांना देवच शिक्षा देईल!” ; साध्वी प्रज्ञा यांची पहिली प्रतिक्रिया

१७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता ; समीर कुलकर्णी कोर्टात अश्रूंना आवरू शकले नाहीत...

मुंबई : 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने एक ऐतिहासिक वळण घडले आहे. या निर्णयामुळे गेली १७ वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या आरोपींच्या भावनांना ऊत आला. यातील एक प्रमुख आरोपी व माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.

“भगवा आतंकवाद म्हणून ज्यांनी आमच्यावर शिक्का मारला, त्यांना देवच योग्य ती शिक्षा देईल”
— साध्वी प्रज्ञा ठाकूर, माजी खासदार

त्या पुढे म्हणाल्या, “माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, मी १७ वर्षे अपमान सहन केला. आम्हाला माहित होतं की आम्ही निर्दोष आहोत, पण तरीही आम्हाला दहशतवादी ठरवण्यात आलं. मी संन्यासी आहे म्हणूनच जिवंत आहे. हा विजय भगव्याचा आहे, हिंदुत्वाचा आहे.”

समीर कुलकर्णी कोर्टातच कोसळले अश्रूंनी…

सहआरोपी समीर कुलकर्णी यांना कोर्टातच अश्रू अनावर झाले. “माझ्या देशाने मला दहशतवादी ठरवलं, कुटुंबीयांची समाजात अवहेलना झाली. पण आम्ही खंबीरपणे लढा दिला,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. न्याय मिळाल्याने त्यांनी कोर्टाच्या आणि जनतेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

“पुनर्जन्म मिळाल्यासारखं वाटतंय” — इतर आरोपींच्या भावना

कोर्टाने निर्दोष मुक्त केलेले अन्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी यांनीही १७ वर्षांच्या लढ्याची व्यथा मांडली.
मेजर उपाध्याय म्हणाले, “माझ्या स्वतःच्या देशात मला दहशतवादी ठरवलं गेलं, ही वेदना शब्दांत मांडता येणार नाही.”

राजकीय प्रतिक्रिया….

भाजप नेत्या उमा भारती यांनी ‘एक्स’ या सोशल प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया देत लिहिले, “भोपाळच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आज निर्दोष सिद्ध झाल्या आहेत. न्यायालयाचे व प्रज्ञाजींचे अभिनंदन.”

Editer Sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??