जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

राष्ट्रवादीत फूट, भाजप आक्रमक ; पुणे जिल्हा परिषद निवडणूक निर्णायक वळणावर

७३ गटांसाठी महासंग्राम ; पुणे जिल्हा परिषदेची सत्ता कुणाची?

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ५ फेब्रुवारीला होत असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, गट–गण पातळीवर बैठका, चर्चासत्रे, तडजोडी आणि पॅनल बांधणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. जिल्हा परिषद गटात दोन पंचायत समिती गण समाविष्ट असल्याने दोन्ही निवडणुकांसाठी एकत्रित पॅनल उभे करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून काटेकोर व्यूहरचना आखली जात आहे.

पुणे जिल्हा परिषदेवर गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता अबाधित आहे. २०१७ च्या निवडणुकीत ७५ सदस्यांच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल ४४ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती. त्या वेळी शिवसेनेला १३, भाजप व काँग्रेसला प्रत्येकी ७ तर अपक्ष व इतरांना काही जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यानंतर जवळपास चार वर्षांचा प्रशासक राजवट, बदललेली लोकसंख्या, आरक्षणातील फेरबदल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट यामुळे यंदाची निवडणूक पूर्णपणे वेगळ्या राजकीय वातावरणात होत आहे.

या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासमोर जिल्हा परिषदेमधील सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट — शरद पवार आणि अजित पवार — सर्व तालुक्यांमध्ये एकत्र लढतील, अशी चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. काही तालुक्यांत मैत्रीपूर्ण तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी बहुतांश ठिकाणी स्वतंत्र लढतीचीच तयारी सुरू आहे.

याच वेळी शिवसेनेतील फूट आणि बदललेली युती–आघाडीची गणिते पाहता, या निवडणुकीत अजित पवार गटासमोर भाजपच प्रमुख विरोधक म्हणून उभा राहणार, हे स्पष्ट झाले आहे. काही तालुक्यांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला भाजप व शिंदे गटाच्या संघटनात्मक ताकदीचा सामना करावा लागणार असून, त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

या पार्श्वभूमीवर ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी एकतर्फी ठरणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. एकीकडे अजित पवार गटाकडून विरोधी पक्षांतील ताकदवान उमेदवारांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे भाजपसह इतर पक्षांकडूनही स्थानिक पातळीवर जुळवाजुळवी करून मजबूत पॅनल उभे करण्यावर भर दिला जात आहे.

जिल्हा परिषदेमध्ये एकूण ७३ गट असले, तरी प्रत्यक्षात जुन्नर, खेड आणि इंदापूर हे प्रत्येकी आठ गट असलेले तालुके जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात जाणार, हे ठरवणारे ठरणार आहेत. या तीन तालुक्यांतील निकालांनीच सत्तास्थापनेचा कौल लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर प्रत्येकी सात गट असलेले दौंड आणि शिरूर हे तालुकेदेखील सत्ता स्थापनेच्या गणितात निर्णायक भूमिका बजावू शकतात.

याशिवाय बारामती तालुक्यात अजित पवार गटासमोर विरोधक किती प्रभावी मोट बांधतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बारामतीत अजित पवार यांचे पारंपरिक वर्चस्व असले, तरी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे येथील लढतही लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.

तालुकानिहाय जिल्हा परिषद गट पाहिले, तर जुन्नर ८, आंबेगाव ५, शिरूर ७, खेड ८, मावळ ५, मुळशी ३, हवेली ६, दौंड ७, पुरंदर ४, वेल्हे २, भोर ४, बारामती ६ आणि इंदापूर ८ असे एकूण ७३ गट आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद गटात दोन पंचायत समिती गण असल्याने पंचायत समितीमध्ये सदस्यसंख्या गटांच्या तुलनेत दुप्पट आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या निकालांचाही जिल्हा परिषदेच्या सत्तासमीकरणावर थेट परिणाम होणार आहे.

एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, भाजपची आक्रमक तयारी, बदललेली लोकसंख्या आणि आरक्षणामुळे बदललेली समीकरणे पाहता, यंदाची पुणे जिल्हा परिषद निवडणूक ही अजित पवारांची राजकीय ताकद आणि नेतृत्वाची कसोटी पाहणारी, तसेच भाजपसाठी सत्ता हस्तगत करण्याची मोठी संधी ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??