जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

पावसाचा मोठा इशारा! पुढील २४ तासांत राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता ; घाटमाथ्यावर यलो अलर्ट…

पुणे : राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले असून नद्या, ओढे आणि धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, तर सखल भाग जलमय झाले. आता भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील २४ तासांसाठी सातारा, पुणे घाटमाथ्यासह काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.

केरळ किनारपट्टीजवळ कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यातील काही जिल्ह्यांत आजही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, गेल्या आठवड्याच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची चिन्हे असून, एक-दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

यंदा राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, जुलैच्या सुरुवातीलाच झालेल्या दमदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून धरणांतील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे.

सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण सध्या ५८.६६ टक्के भरले असून धरणात २०.१८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. अतिवृष्टीमुळे वारणा नदीने धोक्याची पातळी गाठली होती. मात्र, पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने नदीची पाणीपातळी घटू लागली असून पूरस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसामुळे वडज धरणातून मीना नदीत १० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे मीना नदीला पूर आला असून नारायणगाव येथील मेहेर पूल, नेवकर पूल, केटी बंधारे आणि आठवडे बाजार परिसर पाण्याखाली गेला आहे. अनेक शेतजमिनींमध्ये पाणी साचले असून ग्रामपंचायत नारायणगाव व वारुळवाडी यांच्या माध्यमातून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

हवामान विभागाने नागरिकांना नदी, नाले आणि धरण परिसरात जाणे टाळण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??