कृषी व्यापारसामाजिक

शेतकऱ्यांना मिळणार आता फक्त 45 मिनिटात कर्ज असा करावा लागणार अर्ज..

सुनिल थोरात (प्रतिनिधी) 

मुंबई : राज्यात शेती क्षेत्रामध्ये डिजिटल डेटा सर्व्हिस सेवेच्या माध्यमातून लाभ शेतकऱ्यांकडे पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारच्या संकल्पनेवर agristack योजना राबविण्यात येणार आहे.
या नवीन योजने मुळे पीएम किसान योजनेंतर्गत अनुदान मिळवणे सोपे जाणार आहे.तसेच शेतकऱ्यांना पिकावर कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्डसाठी कर्ज उपलब्ध करून देणे अधिक सोपे होणार आहे. सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आधारकार्ड प्रणालीचा वापर केला जातो.
त्यावरून शेतकऱ्याची ओळख पटवली जाते. तसेच दुसरीकडे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी योजनेच्या माध्यमातून मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे आपल्या पिकाची नोंद करण्यासाठी आपल्या गटामध्ये जाणे अनिवार्य केले आहे. पिकाची ई पीक पाहणी करण्यासाठी पिकाचे फोटो घेऊन ते अपलोड करावे लागणार आहे.बीड जिल्ह्यामध्ये २०२३ आणि २०२४ साठी agristack अंतर्गत शेतकऱ्यांचा आधार जोडणी केलेला माहिती संच निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. याद्वारे बीड मधील ६ शेतकऱ्यांना १५ ते ४५ मिनिटात किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार ही योजना राबवली जाणार आहे.किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतात.
           या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते, जेणेकरून त्यांना त्यांची शेतीची कामे सहज सुरू ठेवता येतील. या योजनेतील कर्जाची रक्कम बियाणे, खते, सिंचन आणि इतर कृषी गरजांसाठी वापरली जाऊ शकते. ही योजना शेतकऱ्यांना प्रगत कृषी उपकरणे वापरण्याची सुविधा देखील प्रदान करते, जेणेकरून ते त्यांच्या पीक उत्पादन कार्यक्षमतेत आणखी सुधारणा करू शकतील.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??