शिक्षणसामाजिक

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ७ ते १६ जानेवारीदरम्यान ‘वसुंधरा सप्ताह’ उत्साहात…

हडपसर, पुणे : विद्यार्थ्यांचे भूगोल विषयातील ज्ञान वाढावे तसेच पर्यावरण व निसर्ग सौंदर्य संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने भूगोल दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील भूगोल व बी. व्होक. विभागाच्या वतीने दिनांक ७ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘वसुंधरा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहाचे उद्घाटन दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी एस. एम. जोशी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व भूगोल विभाग प्रमुख डॉ. संजय जगताप तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, भूगोल विभाग प्रमुख व विद्यार्थी विकास मंडळ संचालिका डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. गणेश गांधीले, प्रा. शितल गायकवाड, प्रा. रेवती नेवासकर, डॉ. ज्योती धोत्रे, प्रा. नाजनीन मनेर, प्रा. अविनाश राठोड, डॉ. विद्या पाटील तसेच भूगोल विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वसुंधरा सप्ताहाच्या निमित्ताने भौगोलिक रांगोळी, सामान्य ज्ञान, नकाशा भरणे, पाककला, भौगोलिक प्रश्नमंजुषा, प्रोजेक्ट सादरीकरण, फोटोग्राफी, पीपीटी, मेहंदी तसेच भौगोलिक साहित्य प्रदर्शन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भूगोल विभाग प्रमुख डॉ. सविता कुलकर्णी यांनी, दरवर्षी भूगोल व बी. व्होक. विभागाच्या वतीने हा सप्ताह आयोजित करण्यात येतो. पर्यटन, पर्यावरण आणि माणूस म्हणून आपली भूमिका याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास या उपक्रमातून मदत होते, असे मत व्यक्त केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी, वसुंधरा सप्ताहासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता, सर्जनशीलता आणि व्यावहारिक ज्ञान विकसित होते. अशा उपक्रमांतूनच संवेदनशील व जबाबदार नागरिक घडतात, असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जगताप यांनी “भूगोल हा केवळ विषय नसून तो निसर्ग, मानव आणि पर्यावरण यांचा सुसंवाद आहे. वसुंधरा सप्ताहातील उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहेत,” असा संदेश दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शितल गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. गणेश गांधीले यांनी मानले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??