जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

सहकार चळवळीमुळे महाराष्ट्र समृद्ध : साहेबराव खामकर…

तुळशीराम घुसाळकर

हवेली (पुणे) : सहकार चळवळीमुळे महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागात आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास घडून आला असून सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख साहेबराव खामकर यांनी केले.

सहकार भारतीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते. या वेळी आबासाहेब शिंगोटे, शहाजीराव बोरुडे, नवदीप सोशल फाउंडेशनचे सचिव प्रताप खामकर, प्रा. गहिनीनाथ हुमे, रविंद्र साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.

खामकर पुढे म्हणाले की, सहकारामुळे महाराष्ट्र समृद्ध झाला आहे. मात्र सहकार क्षेत्रातील काही त्रुटी दूर करण्यासाठी सहकार भारतीचे “बिना संस्कार, नही सहकार” हे ब्रीदवाक्य प्रभावीपणे रुजविण्याची आज नितांत गरज आहे.

यावेळी रावळगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड यांनी सहकार क्षेत्रातील उद्योग व्यावसायिक पद्धतीने चालविण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच साखर उद्योगावरील काही बाबींमध्ये सरकारकडून नियंत्रण शिथिल करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे महानगर साखर कारखाना प्रकोष्ठ समन्वयक बाळ भिंगारकर यांनी प्रास्ताविक करत सहकार भारतीच्या कार्याचा आढावा घेतला. वाय. जी. पवार यांनी मनोगतातून सहकारामुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून त्यांच्या संसाराला मोठा आधार मिळाल्याचे नमूद केले.

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार नवीन सहकार धोरण आणत असून, या समितीमध्ये सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगाडे यांचा समावेश झाल्याबद्दल साहेबराव खामकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. तर पुणे जिल्हा पतसंस्था प्रकोष्ठ सहप्रमुख विनोद अष्टुल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??